शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: July 15, 2016 02:29 IST

शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते.

शैलेश नवाल : ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे वर्धा : शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते. पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै आहे. या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. १ आॅगस्ट २०१६ नंतर मंजूर केलेल्या पीक कर्जाला प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू राहणार नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभाकरिता ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. कर्जदार वा बिगर कर्जदार शेतकरी त्यांचा अर्ज अपूर्ण असल्यास विमा कंपनी त्यांचा अर्ज स्वीकारणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाची मदत घ्यावी. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा व पटवाऱ्याचे पेरणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शासनाने निर्धारित केलेल्या रकमेवरच विमा प्रिमीयम कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केल्या जातील. शेतकऱ्यांच्या पिकाच्या कर्जाची रक्कम यात ग्राह्य धरली जाणार नाही. शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरण्यापुर्वीच्या पिकांचे नुकसान ग्राह्य धरण्यात येणार नाही. पीक विमा दावा निपटारा सॅटेलाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असल्याने ज्या पिकाची लागवड शेतीमध्ये करणार आहेत, तेच पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नमूद करावे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज दोन वा अधिक बँकांकडून घेतले असल्यास त्यांचा पीक विमा एकाच बँकेचा ग्राह्य धरला जाणार आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल व अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी केले आहे. खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांकरिता तसेच खरीप भुईमूंग पिकाकरिता शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील अधिसूचित तालुका, पीक व मंडळे याच यादी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास उपलब्ध आहे. २०१६-१७ साठी खरीप ज्वारी २४ हजार, भुईमूग ३० हजार, सोयाबीन ३६ हजार, तीळ २२ हजार, मुग १८ हजार, मका २५ हजार, उडीद १८ हजार, तूर २८ हजार तर कापूस ३६ हजार असे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)