शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: July 15, 2016 02:29 IST

शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते.

शैलेश नवाल : ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे वर्धा : शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते. पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै आहे. या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. १ आॅगस्ट २०१६ नंतर मंजूर केलेल्या पीक कर्जाला प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू राहणार नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभाकरिता ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. कर्जदार वा बिगर कर्जदार शेतकरी त्यांचा अर्ज अपूर्ण असल्यास विमा कंपनी त्यांचा अर्ज स्वीकारणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाची मदत घ्यावी. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा व पटवाऱ्याचे पेरणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शासनाने निर्धारित केलेल्या रकमेवरच विमा प्रिमीयम कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केल्या जातील. शेतकऱ्यांच्या पिकाच्या कर्जाची रक्कम यात ग्राह्य धरली जाणार नाही. शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरण्यापुर्वीच्या पिकांचे नुकसान ग्राह्य धरण्यात येणार नाही. पीक विमा दावा निपटारा सॅटेलाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असल्याने ज्या पिकाची लागवड शेतीमध्ये करणार आहेत, तेच पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नमूद करावे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज दोन वा अधिक बँकांकडून घेतले असल्यास त्यांचा पीक विमा एकाच बँकेचा ग्राह्य धरला जाणार आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल व अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी केले आहे. खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांकरिता तसेच खरीप भुईमूंग पिकाकरिता शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील अधिसूचित तालुका, पीक व मंडळे याच यादी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास उपलब्ध आहे. २०१६-१७ साठी खरीप ज्वारी २४ हजार, भुईमूग ३० हजार, सोयाबीन ३६ हजार, तीळ २२ हजार, मुग १८ हजार, मका २५ हजार, उडीद १८ हजार, तूर २८ हजार तर कापूस ३६ हजार असे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)