शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

प्रत्येक शेतकऱ्याने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा

By admin | Updated: July 15, 2016 02:29 IST

शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते.

शैलेश नवाल : ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावे वर्धा : शासनाच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम २०१६-१७ मध्ये राज्य शासनाच्यावतीने खरीप व रबी मोसमातील पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येते. पीक विमा योजनेची मुदत ३१ जुलै आहे. या योजनेचा प्रत्येक शेतकऱ्याने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. १ आॅगस्ट २०१६ नंतर मंजूर केलेल्या पीक कर्जाला प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू राहणार नाही. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभाकरिता ३१ जुलैपर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. कर्जदार वा बिगर कर्जदार शेतकरी त्यांचा अर्ज अपूर्ण असल्यास विमा कंपनी त्यांचा अर्ज स्वीकारणार नाही. यासाठी शेतकऱ्यांनी आपला विमा अर्ज भरण्याकरिता कृषी विभागाची मदत घ्यावी. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत सातबारा व पटवाऱ्याचे पेरणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. शासनाने निर्धारित केलेल्या रकमेवरच विमा प्रिमीयम कर्ज शेतकऱ्यांच्या खात्यावर वळती केल्या जातील. शेतकऱ्यांच्या पिकाच्या कर्जाची रक्कम यात ग्राह्य धरली जाणार नाही. शेतकऱ्यांनी पीक विमा हप्ता भरण्यापुर्वीच्या पिकांचे नुकसान ग्राह्य धरण्यात येणार नाही. पीक विमा दावा निपटारा सॅटेलाईट, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने होत असल्याने ज्या पिकाची लागवड शेतीमध्ये करणार आहेत, तेच पीक कर्ज घेताना शेतकऱ्यांनी अर्जामध्ये नमूद करावे. शेतकऱ्यांनी पीक कर्ज दोन वा अधिक बँकांकडून घेतले असल्यास त्यांचा पीक विमा एकाच बँकेचा ग्राह्य धरला जाणार आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवाल व अग्रणी जिल्हा प्रबंधक विजय जांगडा यांनी केले आहे. खरीप ज्वारी, सोयाबीन, तूर व कापूस पिकांकरिता तसेच खरीप भुईमूंग पिकाकरिता शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील अधिसूचित तालुका, पीक व मंडळे याच यादी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयास उपलब्ध आहे. २०१६-१७ साठी खरीप ज्वारी २४ हजार, भुईमूग ३० हजार, सोयाबीन ३६ हजार, तीळ २२ हजार, मुग १८ हजार, मका २५ हजार, उडीद १८ हजार, तूर २८ हजार तर कापूस ३६ हजार असे आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)