शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत बाप्पाला पर्यावरणपूरक निरोप

By admin | Updated: September 16, 2016 02:51 IST

बाप्पामुळे दहा दिवस चैतन्यमय वातावरण होते. अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस गुरुवारी उजळला.

वर्धा : बाप्पामुळे दहा दिवस चैतन्यमय वातावरण होते. अखेर बाप्पाला निरोप देण्याचा दिवस गुरुवारी उजळला. गणपती बाप्पा मोरय्या...पुढल्या वर्षी लवकर या...असा जयघोष करीत वर्धेकरांनी जड अंतकरणाने बाप्पाला निरोप दिला. यातच गणेश मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करून पर्यावरण बचावचा संदेशही दिला. दहा दिवस बाप्पाची पूजा-अर्चना केल्यानंतर मूर्तीचे नदी-नाल्यात विसर्जन केले जाते. निर्माल्यही तेथेच फेकले जाते. यामुळे नदी-नाल्याचे पाणी दूषित होते. शिवाय पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होतो. या विचाराने प्रेरीत झालेल्या हजारावर नागरिकांनी आपल्या घरगुती गणेश मूर्तीचे पर्यावरणपूक पद्धतीने विसर्जनाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. बाप्पाच्या आगमणाची चाहुल लागताच ‘लोकमत’ने प्लास्टर आॅफ पॅरीसऐवजी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाचा बचावासाठी बातम्यांच्या माध्यमातून जागर केला होता. वर्धेकरांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे विसर्जनादरम्यान दिसून आले. १५-२० मूर्ती सोडल्यातर उर्वरीत मूर्ती मातीच्याच असल्याचे लक्षात आले. बाप्पाचे आगमण झाल्यापासून गणेशमूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्याबाबत जागर करण्यात आला. याच पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची गत वर्षी जागृती करणाऱ्या वैद्यकीय जनजागृती मंचच्यावतीने हनुमान टेकडीवर तयार केलेल्या कुंडात गणेश विसर्जनाकरिता आलेल्या मूर्तींची महाआरती करण्यात आली. या महाआरतीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरूषोत्तम मडावी यांच्यासह वैद्यकीय जनजागृतीमंचाचे सदस्य व नागरिकांची उपस्थिती होती. महाआरतीनंतर येथे आलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन त्या कुंडात करण्यात आले. पर्यावरण बचावसाठी यंदा शहरातील विविध संघटना सरसावल्या. शहरातील ठिकठिकाणी पाण्याचे हौद भरुन ठेवण्यात आले होते. तसेच निर्माल्य दानासाठीची व्यवस्थाही तेथेच करण्यात आली. हनुमान टेकडीवर गणेश विसर्जनाकरिता रात्री उशिरापर्यंत नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती. रात्री ७.३० वाजतापर्यंत ८५० वर मूर्तीचे विसर्जन करण्यात आल्याचे वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. स्वाध्याय मंदिर परिसरात लायन्स क्लब, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती, आचार्य श्रीमन्नारायन तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्यावतीने गणेश मूर्ती विसर्जनाची व्यवस्था केलेली होती. येथे ४५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. वर्धा नगर पालिकेच्यावतीने शहरातील धुनिवाले चौक, सोशालिस्ट चौक व आर्वी नाका चौक येथे पाण्याचे हौद ठेवण्यात आले होते. ती तिनही ठिकाणी ११८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शिवाजी चौकात अग्निहोत्री तंत्रनिकेतन नागठाणाच्यावतीने पाण्याचा हौद ठेवला होता. येथे ६३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरूच असल्याने हा आकडा वाढतच होता.(लोकमत न्यूज नेटवर्क)