शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी

By admin | Updated: July 14, 2017 01:26 IST

प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे.

रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : प्रतिष्ठेचा आणि नोकरीची हमी असलेला अभ्यासक्रम म्हणून ओळख असलेल्या अभियांत्रिकीवर प्रवेशाची दिवाळखोरी आली आहे. या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचा नकार येत असल्याने महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आली आहेत. अभियांत्रिकीकरिता असलेल्या केंद्रियभूत प्रवेश प्रक्रियेचा दुसरा टप्पा पार पडला असून वर्धेतील तब्बल ६९ टक्के जागा रिक्त आहेत. हे अंतिम चित्र नसून चौथ्या फेरीनंतर रिक्त जागांचे खरे चित्र समोर येणार आहे. विविध अभ्यासक्रमांची महाविद्यालये असलेल्या वर्धेची ओळख एज्युकेशन हब म्हणून होत असताना येथे शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे रोवल्या गेली. परिणामी विद्यार्थ्यांचा येथील महाविद्यालयांवरचा विश्वास उडाला. प्रवेशाअभावी वर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या घटली. पूर्वी १० महाविद्यालये असलेल्या वर्धेत जुने सात एक नवे असे एकूण आठ महाविद्यालये आहेत. ही आठ महाविद्यालये मिळून केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रियेतून एकूण २,३०७ जागा भरावयाच्या आहेत. केवळ अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय आणि आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरींगने दोनच महाविद्यालयाने संस्थेचा कोटा ठेवला असून इतर महाविद्यालयांनी तो जमा केला आहे. एकीकडे तंत्रशिक्षण मंडळाने दिलेल्या जागा रिक्त असताना या व्यवस्थापन कोट्यात कोण प्रवेश घेईल अशी स्थिती आहे. या व्यवस्थापन कोट्याच्या माध्यमातून होत असलेल्या प्रवेशावरच शिष्यवृत्तीचा घोळ कायम आहे. आतापर्यंत एकूण ७१० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून तोही निश्चित नसल्याचे चित्र आहे. महाकाली शिक्षण संस्थेचे दुसरे महाविद्यालयही बंद होण्याच्या मार्गावर वर्धेत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी बाबुलालजी अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरींग विद्यार्थ्यांच्या प्रवेशांअभावी बंद पडले आहे. आता याच कारणाने त्यांचे अग्निहोत्री कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगही बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या महाविद्यालयात २४० जागा असून केवळ १३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. तर आर्वी येथील आर.व्ही. पराडकर कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये १९२ जागा असताना केवळ नऊच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कमी प्रवेश असणाऱ्या महाविद्यालयांची गरज काय ? जिल्ह्यात असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेत नाही. अनेक महाविद्यालयात असलेल्या विद्यार्थी संख्येवरून तेथील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च निघत असल्याचे दिसून आले आहे. यातही विशेष म्हणजे ज्या महाविद्यालयात प्रवेश कमी आहे त्याच महाविद्यालयात शिष्यवृत्ती घोटाळ्याची मुळे आहे. इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय अभियांत्रिकी अभ्यासक्रमात असलेल्या विविध शाखांपैकी इलेक्ट्रिकल टेलिकॉमची अवस्था दयनीय आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या एकूण ३३३ जागा असून केवळ २७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. याची टक्केवारी केवळ ८ असून ९२ टक्के जागा रिक्त आहेत. यात शंकर प्रसाद अग्निहोत्री महाविद्यालयात या अभ्यासक्रमाच्या ६० जागा असून त्यात केवळ दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. ओेम अभियांत्रिकी महाविद्यालयात शून्य, सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात एक, दत्ता मेघे ६० पैकी १६, अग्निहोत्री कॉलेज आॅफ अभियांत्रिकीत शुन्य, बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयात आठ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.