शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचा बाजार

By admin | Updated: August 23, 2015 02:19 IST

शहराला लागलेला अतिक्रमणाचा शाप दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन कुणीही उपायोजना वा कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार घडत आहे.

वर्धा : शहराला लागलेला अतिक्रमणाचा शाप दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. यावर नगर परिषद आणि जिल्हा प्रशासन कुणीही उपायोजना वा कारवाई करीत नसल्यानेच हा प्रकार घडत आहे. यात शहराचा श्वास मांत्र कोंडला जात असल्याचे दिसते. सध्या शहरातील अतिक्रमणात जागोजागी वाढच होत असल्याचे दिसते. बाजार ओळींमध्ये तर याचा कळसच गाठल्याचे चित्र आहे. भाजी बाजारासाठी लोकमान्य टिळक यांचा पुतळा असलेला परिसर देण्यात आला आहे; पण सध्या भाजीविके्रते आतमध्ये कमी आणि रस्त्यावरच अधिक दिसून येतात. यामुळे रस्ते निमूळते झाले असून परिसरातील अस्वच्छताही वाढीस लागली आहे. यात बाजाराची व्यवस्थाही कोलमडल्याचे दिसते.ंशहरातील लोकमान्य टिळक यांचा पुतळा असलेला भाजी बाजार गोल बाजार म्हणूनही प्रसिद्ध आहे. हा परिसर भाजी बाजाराकरिता देण्यात आलेला आहे. टिळक पुतळा असलेल्या कुंपण केलेल्या भागातच बाजार भरावा, असा उद्देश होता; पण सध्या भाजीविक्रेते त्या परिसरात कमी आणि रस्त्यावरच अधिक दुकाने लावत असल्याचे दिसते. टिळक मार्केट परिसरामध्ये काही दुकाने लागलेली आहेत तर उर्वरित विक्रेते त्या जागेचा उपयोग केवळ माल ठेवण्याकरिता करीत असल्याचे दिसून येते. पुतळ्यासमोरील उर्वरित परिसरात चार चाकी बंड्या उभ्या केल्या जात असल्याचे दिसून आले. याच बंड्यांवर काही जुगारी, सट्टापट्टी व्यवसाय करणारेही दिसतात. शिवाय या बाजाराच्या सभोवतालच्या परिसरात अनेक दारूविक्रेतेही सक्रीय आहेत. यामुळे परिसरातील रहिवाश्यांना मात्र त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसते.टिळक मार्केटच्या बाहेर रस्त्यांवर दुकाने, चार चाकी बंड्या लावून भाजी तसेच फळ विक्रेते व्यवसाय करताना दिसतात. त्यांच्या पाठोपाठ अन्य वस्तूंचीही दुकाने रस्त्यावरच लावली जातात. यामुळे रस्ते अत्यंत निमूळते झाले आहेत. टिळक मार्केटच्या गेटजवळ असलेल्या झाडाच्याही पूढे दुकाने थाटली जातात. ही दुकाने रस्त्याच्या अगदी मधोमध येतात. यामुळे तेथून वाहने घेऊन जाताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हा प्रकार बाजारातील एक-दोन रस्त्यांवर असता तर त्याकडे दुर्लक्ष करता आले असते; पण बाजारातील प्रत्येकच ओळीमध्ये अतिक्रमण करून रस्त्यावर दुकाने थाटली जातात. यामुळे सामान्यांना ये-जा करताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाय रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्याकरिताही जागा शिल्लक राहत नाही. बाजारात गेल्यानंतर कुठेतरी एखाद्या ठिकाणी वाहने उभी करून संपूर्ण बाजार पायी पिंजून काढावा लागतो. अन्यथा वाहनांच्या गर्दीत ताटकळावे लागते. गोल बाजारातून सराफ लाईन, पत्रावळी लाईन व अन्य चौकांकडे जातानाही नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सराफ लाईन परिसरात रस्त्यापर्यंत दुकाने असून तेथेच वाहनेही उभी केली जातात. या परिसरात कुठेही पार्किंगसाठी जागा नाही. यामुळे नागरिकांची गोची होते.श्री राम मंदिर तसेच परिसरातील प्रत्येकच रस्त्यावर दुकाने असून ती अतिक्रमणात थाटण्यात आली आहेत. केवळ चार चाकी बंड्याच लावल्या नाही तर त्या कायम राहतील, अशी व्यवस्थाही अनेक विक्रेत्यांनी केल्याचे प्रत्यक्ष भेट दिल्यास लक्षात येते. एका बाजूला पक्की दुकाने आणि दुसऱ्या बाजूने अतिक्रमण करून थाटलेली दुकाने, यामुळे ये-जा करण्याकरिता रस्ताच शिल्लक राहत नाही. या प्रकारामुळे गोल बाजार तसेच परिसरातील प्रत्येक ओळींमध्ये गर्दीच दिसते. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.