शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी व ग्रामीण कारागिरांचे सशक्तीकरण आवश्यक

By admin | Updated: April 5, 2017 00:36 IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते.

अभिमन्यू भारतीय : खादी व ग्रामोद्योगाच्या प्रचाराबाबत चर्चा सेवाग्राम : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते. यामुळे शेतकरी सर्वत्र समृद्ध व आनंददायी जीवन जगत होते. शेतकरी व ग्रामीण भाग सुखी तर राष्ट्र सुखी; पण कालांतराने शासन व राजकीय स्तरावर धोरण बदलले. शेती, शेतकरी व ग्रामीण उद्योगांची पिछेहाट झाली. औद्योगिक धोरणामुळे शेती व ग्रामोद्योग लयास गेले. शेतकरी व ग्रामीण कारागिरांच्या सशक्तीकरणाची वेळ आली. यामुळे प्रत्येकाने खादी व ग्रामद्योगांच्या वस्तूंचा आग्रह धरल्यास ग्रामीण भागाला सुगीचे दिवस येतील, असा विश्वास ‘लोकमत’शी संवाद साधताना अभिमन्यू भारतीय यांनी व्यक्त केला. स्वराज्य अभियानचे कार्यकर्ता असलेले अभिमन्यू शाळा, महाविद्यालयात खादी व ग्रामोद्योगाचा प्रचार, प्रसार करीत आहे. रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी युवकांना प्रोत्साहन देत आहेत. नई तालीम येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय म्हणाले की, देशातील अन्नदाता आर्थिक संकटात सापडला आहे. यातूनच निर्माण विषम अवस्थेमुळे आत्महत्या होत आहे. ग्रामीण रोजगाराची परिस्थितीही गंभीर आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात २० कोटी लोकांना सर्व क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. स्वयंचलित यंत्रामुळे रोजगार कमी व बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यातून राष्ट्रघातक परिस्थिती निर्माण व्हायला लागली. याचे धोके आता शासन व नागरिकांनी ओळखले पाहिजे. मोठी लोकसंख्या, सर्वात मोठी लोकशाही व कृषीप्रधान देशात खादी व ग्रामोद्योगाला चालना दिली तर रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटेल. एवढेच नव्हे तर कापूस ते कपडा या उपक्रमाला यश मिळेल. शेतकऱ्यांनी सूतकताई व छोट्या कापड विणणाऱ्या यंत्राचा उपयोग करावा. यामुळे आत्मनिर्भर होऊन बाजार व्यवस्थेचा धोका टळेल. संपूर्ण परिवार सहभागी असल्याने सुखी, पारिवारिक जीवन जगता करता येईल, असेही अभिमन्यू यांनी सांगितले. या उपक्रमावर १० मिनीटाचा माहितीपटही तयार करण्यात आलेला आहे. २०१८ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही अभिमन्यू यांनी सांगितले.(वार्ताहर)