शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

शेतकरी व ग्रामीण कारागिरांचे सशक्तीकरण आवश्यक

By admin | Updated: April 5, 2017 00:36 IST

भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते.

अभिमन्यू भारतीय : खादी व ग्रामोद्योगाच्या प्रचाराबाबत चर्चा सेवाग्राम : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित सर्व उद्योग ग्रामीण भागात होते. यामुळे शेतकरी सर्वत्र समृद्ध व आनंददायी जीवन जगत होते. शेतकरी व ग्रामीण भाग सुखी तर राष्ट्र सुखी; पण कालांतराने शासन व राजकीय स्तरावर धोरण बदलले. शेती, शेतकरी व ग्रामीण उद्योगांची पिछेहाट झाली. औद्योगिक धोरणामुळे शेती व ग्रामोद्योग लयास गेले. शेतकरी व ग्रामीण कारागिरांच्या सशक्तीकरणाची वेळ आली. यामुळे प्रत्येकाने खादी व ग्रामद्योगांच्या वस्तूंचा आग्रह धरल्यास ग्रामीण भागाला सुगीचे दिवस येतील, असा विश्वास ‘लोकमत’शी संवाद साधताना अभिमन्यू भारतीय यांनी व्यक्त केला. स्वराज्य अभियानचे कार्यकर्ता असलेले अभिमन्यू शाळा, महाविद्यालयात खादी व ग्रामोद्योगाचा प्रचार, प्रसार करीत आहे. रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षणासाठी युवकांना प्रोत्साहन देत आहेत. नई तालीम येथे आले असता त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. भारतीय म्हणाले की, देशातील अन्नदाता आर्थिक संकटात सापडला आहे. यातूनच निर्माण विषम अवस्थेमुळे आत्महत्या होत आहे. ग्रामीण रोजगाराची परिस्थितीही गंभीर आहे. यामुळे बेरोजगारांची संख्या वाढत आहे. १२५ कोटी लोकसंख्येच्या देशात २० कोटी लोकांना सर्व क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. स्वयंचलित यंत्रामुळे रोजगार कमी व बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यातून राष्ट्रघातक परिस्थिती निर्माण व्हायला लागली. याचे धोके आता शासन व नागरिकांनी ओळखले पाहिजे. मोठी लोकसंख्या, सर्वात मोठी लोकशाही व कृषीप्रधान देशात खादी व ग्रामोद्योगाला चालना दिली तर रोजगाराचा प्रश्न काही अंशी मिटेल. एवढेच नव्हे तर कापूस ते कपडा या उपक्रमाला यश मिळेल. शेतकऱ्यांनी सूतकताई व छोट्या कापड विणणाऱ्या यंत्राचा उपयोग करावा. यामुळे आत्मनिर्भर होऊन बाजार व्यवस्थेचा धोका टळेल. संपूर्ण परिवार सहभागी असल्याने सुखी, पारिवारिक जीवन जगता करता येईल, असेही अभिमन्यू यांनी सांगितले. या उपक्रमावर १० मिनीटाचा माहितीपटही तयार करण्यात आलेला आहे. २०१८ मध्ये गांधीजींची १५० वी जयंती असल्याने हा उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही अभिमन्यू यांनी सांगितले.(वार्ताहर)