शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

३४ महिन्यांच्या वेतनाकरिता कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: July 15, 2016 02:29 IST

येथील जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना गत ३४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही.

वर्धा जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेतील प्रकरण वर्धा : येथील जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेतील कर्मचाऱ्यांना गत ३४ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. परिणामी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्याकडून गुरुवारपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. बँकेकडून आॅगस्ट २०१३ ते जून २०१६ पर्यंतचे एकूण ३४ महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची बँकेत काम करण्याची मानसिकता नाही. ३४ महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने कुटुबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुलामुलींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आर्थिक बाजू ढासळल्यामुळे दैनंदिन व्यवहार कसे करावे हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमक्ष उभा ठाकला आहे. परिवारातील व्यक्तीच्या आजारपणात औषधोपचाराचा सुद्धा करून शकत नाही. या सर्व बाबीचा शासन स्तरावर अनेकदा पाठपुरावा केला; परंतु कर्मचाऱ्यांच्या या ३४ महिन्यांच्या पगाराबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची मानसिक स्थिती ढासळली असून बँकेत काम करण्याची मनस्थिती नाही. यामुळे पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला असल्याचे माहितीपत्रकातून कळविले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)