शहरं
Join us  
Trending Stories
1
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
2
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
3
‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 
4
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीचे धक्कादायक खुलासे, टोळीत अनेकांचा समावेश
5
आर्थिक अडचणींमुळे अभिनय क्षेत्र सोडून झाला जादूगार? लोकप्रिय अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाला-
6
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
7
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
8
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
9
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
10
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
11
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
12
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
13
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
14
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
15
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
16
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
17
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
18
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
19
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
20
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव

विद्युत पुरवठा खंडित कृषी ग्राहकांना दिलासा

By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST

राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत.

कृषी संजीवनी योजना : साडेसहा हजार थकबाकीदारांना लाभवर्धा : राज्य शासनाने थकित वीज बिल कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी लागू केलेल्या नवीन सुधारित कृषी संजीवनी योजनेचा लाभ आता तात्पूरते व कायम वीज पुरवठा खंडित असलेल्या शेतकऱ्यांनाही मिळणार आहेत. याबाबतचे परिपत्रक संबंधित विभागांना प्राप्त झाले आहे.कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकित रकमेचा बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने ‘कृषी संजीवणी २०१४’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, चालू कृषी ग्राहकांना त्यांच्या ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ रकमेची ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा तीन मासिक हप्त्यांमध्ये भरली तर उर्वरित ५० टक्के मूळ थकित रक्कम महाराष्ट्र शासनातर्फे महावितरणला विद्युत कायदा-२००३ कलम - ६५ प्रमाणे रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरुपात अदा करण्यात येणार आहे. तसेच योजनेचा लाभ घेणाऱ्या कृषी ३१ मार्च २०१४ पर्यंतचे थकित असलेले पूर्ण व्याज व दंड हे महावितरणतर्फे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कृषी ग्राहकांना ५० टक्के मूळ थकबाकीची रक्कम ३१ आॅगस्ट व ३० सप्टेंबरपर्यंत प्रत्येकी २० टक्के व ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत १० टक्के किंवा उर्वरित रक्कम भरता येणार आहे. ५० टक्के मूळ थकबाकी एकरकमी ३१ आॅगस्टपूर्वी भरता येऊ शकते, असा हा निर्णय आहे; मात्र योजनेतील कृषी ग्राहकांना १ एप्रिलनंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे व नियमित भरणा करावी लागणार, अशी अटही घातली आहे. या निर्णयानुसार, ज्या कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा कायम खंडित करण्यात आला आहे. त्यांना मात्र कुठेही सामावून घेण्यात आलेले नव्हते; पण २८ आॅगस्ट रोजी शासनाने अध्यादेश काढून या शेतकऱ्यांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यांनी ३१ आॅगस्टपर्यंत थकित रकमेपैकी २० टक्के रक्कम जमा करणे आवश्यक होते. हा अवधी निघून गेल्यामुळे आता वीज पुरवठा तात्पूरता व कायम बंद असलेल्या कृषी ग्राहकांना या योजनेत समाविष्ट करण्याबाबत पेच निर्माण झाला आहे. सदर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा घेता येईल आणि कसा देता येईल, याबाबत संबंधित कृषी ग्राहक आणि महावितरण बुचकळ्यात पडले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)