शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
3
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
4
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
5
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
6
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
7
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
8
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
9
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
10
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
11
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
12
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
13
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
14
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
15
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
16
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
17
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
18
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
19
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
20
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती

कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे कोलमडली परिवहनची प्रवासी सेवा

By admin | Updated: April 8, 2015 01:53 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचा मेळावा अहमदनगर येथे आयोजित होता़

तळेगाव (श्या़पंत) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचा मेळावा अहमदनगर येथे आयोजित होता़ या मेळाव्याला हजेरी लावण्याकरिता स्थानिक आगारातील सुमारे ७० कामगार, कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्या़ यामुळे ४ ते ६ एप्रिल या तीन दिवसांत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ यात परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले तर प्रवाश्यांचीही ताटकळ झाली़ स्थानिक आगारातून दररोज आठ हजार किमी प्रवासी वाहतूक केली जाते; पण दोन-तीन दिवस कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे केवळ दोन ते अडीच हजार किमीची प्रती दिवशी प्रवासी वाहतूक करण्यात आली़ चालक, वाहक रजेवर असल्याने अनेक शेड्युल व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या़ येथील आगारात जवळपास १०० कामगार कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ७० कामगारांनी सुट्या घेतल्या होत्या़ यामुळे ही परिस्थिती ओढवली़ सध्या परिवहन महामंडळाची आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. कामगरांनीच ही बाब समजून घेऊन परिवहन महामंडळाला बळकटी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही़ तळेगाव आगाराच्या इतिहासात प्रथमच आगारातून स्वतंत्र गाडी अधिवेशनाला गेली़ याचाच अर्थ एका संघटनेचे सुमारे ५० कामगार अधिवेशनाला गेले, हे निश्चित़ यामुळे प्रवासी वाहतुकीवर प्रचंड ताण आला होात़ यात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांना सुट्या कशा काय देण्यात आल्या, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे़ या बाबत वरिष्ठ अधिकारीही काहीच बोलण्यास तयार नसल्याने प्रवाश्यांद्वारे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़(वार्ताहर)