शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे कोलमडली परिवहनची प्रवासी सेवा

By admin | Updated: April 8, 2015 01:53 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचा मेळावा अहमदनगर येथे आयोजित होता़

तळेगाव (श्या़पंत) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचा मेळावा अहमदनगर येथे आयोजित होता़ या मेळाव्याला हजेरी लावण्याकरिता स्थानिक आगारातील सुमारे ७० कामगार, कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्या़ यामुळे ४ ते ६ एप्रिल या तीन दिवसांत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ यात परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले तर प्रवाश्यांचीही ताटकळ झाली़ स्थानिक आगारातून दररोज आठ हजार किमी प्रवासी वाहतूक केली जाते; पण दोन-तीन दिवस कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे केवळ दोन ते अडीच हजार किमीची प्रती दिवशी प्रवासी वाहतूक करण्यात आली़ चालक, वाहक रजेवर असल्याने अनेक शेड्युल व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या़ येथील आगारात जवळपास १०० कामगार कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ७० कामगारांनी सुट्या घेतल्या होत्या़ यामुळे ही परिस्थिती ओढवली़ सध्या परिवहन महामंडळाची आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. कामगरांनीच ही बाब समजून घेऊन परिवहन महामंडळाला बळकटी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही़ तळेगाव आगाराच्या इतिहासात प्रथमच आगारातून स्वतंत्र गाडी अधिवेशनाला गेली़ याचाच अर्थ एका संघटनेचे सुमारे ५० कामगार अधिवेशनाला गेले, हे निश्चित़ यामुळे प्रवासी वाहतुकीवर प्रचंड ताण आला होात़ यात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांना सुट्या कशा काय देण्यात आल्या, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे़ या बाबत वरिष्ठ अधिकारीही काहीच बोलण्यास तयार नसल्याने प्रवाश्यांद्वारे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़(वार्ताहर)