शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पावधीतच उखडले वर्धा-हिंगणघाट मार्गावरील डांबरीकरण

By admin | Updated: January 17, 2017 01:09 IST

वर्धा ते हिंगणघाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.

निकृष्ट दर्जाचे काम : रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी, ग्रामस्थांमध्ये संतापतळेगाव (टा.) : वर्धा ते हिंगणघाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले; पण ते अल्पावधीतच उखडले. यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला. याकडे लक्ष देत रस्ता बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.वर्धा ते हिंगणघाट मार्गावर वायगाव, नेरी, मिरापूर, सेलू काटे, इंझापूर, भुगाव, तळेगाव, सोनेगाव, धोत्रा परिसरात अनेक वर्षांपासून खड्डे पडले होते. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागत आहे. या मार्गावर आतापर्यंत लहान-मोठे अपघात झालेत. यामुळे गत काही महिन्यांपासून रस्त्यावर गिट्टी टाकून नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे; पण डांबरीकरण होताच काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. सर्वत्र डांबरीकरण उखडून रस्त्यावर गिट्टी विखुरली आहे. यामुळे गत एक-दोन दिवसांत सुलतानपूर फाट्याजवळ हनुमान मंदिराजवळ गिट्टी उखडलेल्या ठिकाणी अनेक जन गाडीवरून घसरून पडले. नव्याने डांबरीकरण होऊनही दोन-चार दिवसांतच उखडल्याने रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावर गिट्टी उखडलेल्या ठिकाणी पुन्हा मलमपट्टी करण्यात येत आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच दुरूस्तीची वेळ आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. रस्त्याच्या दुरूस्ती कामात डांबराचा वापर केला होता की नाही, अशी शंकाही नागरिक उपस्थित करू लागले आहेत. वास्तविक, हा राज्यमार्ग असल्याने दर्जेदार बांधकामाची अपेक्षा केली जाते; पण प्रत्येक वेळी निकृष्ट साहित्याचा वापर करीत कामे केली जात असल्याने रस्त्यावर अवकळा येत असल्याचे दिसते. आता डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून गिट्टी पसरली आहे. यामुळे वाहन चालकांना अपघाताला सामारे जावे लागत आहे. गिट्टीवरून रस्ता शोधताना दुचाकी घसरून चालक जखमी होत आहेत. या रस्त्याच्या बांधकामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, संबंधित कंत्राटदाराला जाब विचारून दर्जेदार रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)अपघाताच्या घटनांमुळे वाहन चालक त्रस्तवर्धा ते हिंगणघाट हा राज्यमार्ग आहे. या रस्त्याची गत कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली असून खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अनेकदा डागडुजी करण्यात आली. वर्धा ते वायगाव मार्गाचे डांबरीकरणही करण्यात आले होते; पण अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. सध्या वायगाव ते हिंगणघाट दरम्यान डांबरीकरण सुरू असून ‘पुढे पाठ, मागे सपाट’, अशी स्थिती पाहायला मिळते. काम पूर्ण होण्यापूर्वीच डांबरीकरण उखडत असून गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. या गिट्टीवरून घसरून अनेक दुचाकी चालकांचा अपघात झाला. गत दोन-तीन दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होत आहे. या रस्त्याचे दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.