शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
टँक फुल अन् आंबा घाटापर्यंतचा प्रवास! स्कोडा कायलॅकने चकीत केले; परत पुण्यात येताना एवढे मायलेज दिले...
4
Wife Crime: तिने पतीला घरातच पुरलं, पण एका चुकीमुळे सगळं उघडं पडलं; नालासोपारातील हत्येची Inside Story
5
टाटा, LG, PhonePe सह अनेक कंपन्यांचे IPO येणार! 'या' वर्षातील सर्वात मोठा IPO हंगाम, बंपर कमाईची संधी!
6
हे आहेत ८८ वर्षांचे माजी IPS अधिकारी, रोज सकाळी स्वच्छतेसाठी उतरतात रस्त्यावर; Video पाहून तुम्हीही भावुक व्हाल...
7
जॉब सोडला अन् शेती केली, MBA पास तरुणीची कमाल; टोमॅटो विकून करतेय कोट्यवधींची कमाई
8
"मराठीसारखं काम करु नका यार", हिंदी दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून छाया कदमने शूटिंगच थांबवलं
9
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला तुमच्यावरही होऊ शकते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतकथा आणि लाभ!
10
'वृत्तपत्रातून पती-सासऱ्याची माफी मागा', पदाचा गैरवापर करणाऱ्या IPS पत्नीला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
11
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
15
निर्दोष सुटलेले डॉ. शेख कायदेविषयक सल्लागार; पुन्हा रमले शिक्षकी पेशात
16
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
17
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
18
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
19
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
20
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!

अल्पावधीतच उखडले वर्धा-हिंगणघाट मार्गावरील डांबरीकरण

By admin | Updated: January 17, 2017 01:09 IST

वर्धा ते हिंगणघाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.

निकृष्ट दर्जाचे काम : रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी, ग्रामस्थांमध्ये संतापतळेगाव (टा.) : वर्धा ते हिंगणघाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले; पण ते अल्पावधीतच उखडले. यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला. याकडे लक्ष देत रस्ता बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.वर्धा ते हिंगणघाट मार्गावर वायगाव, नेरी, मिरापूर, सेलू काटे, इंझापूर, भुगाव, तळेगाव, सोनेगाव, धोत्रा परिसरात अनेक वर्षांपासून खड्डे पडले होते. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागत आहे. या मार्गावर आतापर्यंत लहान-मोठे अपघात झालेत. यामुळे गत काही महिन्यांपासून रस्त्यावर गिट्टी टाकून नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे; पण डांबरीकरण होताच काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. सर्वत्र डांबरीकरण उखडून रस्त्यावर गिट्टी विखुरली आहे. यामुळे गत एक-दोन दिवसांत सुलतानपूर फाट्याजवळ हनुमान मंदिराजवळ गिट्टी उखडलेल्या ठिकाणी अनेक जन गाडीवरून घसरून पडले. नव्याने डांबरीकरण होऊनही दोन-चार दिवसांतच उखडल्याने रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावर गिट्टी उखडलेल्या ठिकाणी पुन्हा मलमपट्टी करण्यात येत आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच दुरूस्तीची वेळ आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. रस्त्याच्या दुरूस्ती कामात डांबराचा वापर केला होता की नाही, अशी शंकाही नागरिक उपस्थित करू लागले आहेत. वास्तविक, हा राज्यमार्ग असल्याने दर्जेदार बांधकामाची अपेक्षा केली जाते; पण प्रत्येक वेळी निकृष्ट साहित्याचा वापर करीत कामे केली जात असल्याने रस्त्यावर अवकळा येत असल्याचे दिसते. आता डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून गिट्टी पसरली आहे. यामुळे वाहन चालकांना अपघाताला सामारे जावे लागत आहे. गिट्टीवरून रस्ता शोधताना दुचाकी घसरून चालक जखमी होत आहेत. या रस्त्याच्या बांधकामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, संबंधित कंत्राटदाराला जाब विचारून दर्जेदार रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)अपघाताच्या घटनांमुळे वाहन चालक त्रस्तवर्धा ते हिंगणघाट हा राज्यमार्ग आहे. या रस्त्याची गत कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली असून खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अनेकदा डागडुजी करण्यात आली. वर्धा ते वायगाव मार्गाचे डांबरीकरणही करण्यात आले होते; पण अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. सध्या वायगाव ते हिंगणघाट दरम्यान डांबरीकरण सुरू असून ‘पुढे पाठ, मागे सपाट’, अशी स्थिती पाहायला मिळते. काम पूर्ण होण्यापूर्वीच डांबरीकरण उखडत असून गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. या गिट्टीवरून घसरून अनेक दुचाकी चालकांचा अपघात झाला. गत दोन-तीन दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होत आहे. या रस्त्याचे दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.