शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

गाळपेऱ्यामुळे पक्ष्यांची वीण धोक्यात

By admin | Updated: March 16, 2017 00:41 IST

धरणाचे पाणी कमी होताच उघड्या पडलेल्या जमिनीवर शेती केली जाते. याला गाळपेरा म्हणतात.

पाणपक्ष्यांची संख्या घटतेय : बहुतांश धरणांवर वाढलाय गाळपेरा वर्धा : धरणाचे पाणी कमी होताच उघड्या पडलेल्या जमिनीवर शेती केली जाते. याला गाळपेरा म्हणतात. या गाळपेऱ्यामुळे पक्ष्यांचे अधिवास मानवी हस्तक्षेपाच्या दबावाखाली येत आहे. परिणामी, काही पाणपक्ष्यांची वीण धोक्यात आली आहे. पोथरा, लालनाला, महाकाळी, अप्पर वर्धा, निम्न वर्धा, कार प्रकल्प, रिधोरा, मदन, डोंगरगाव तलावासह अनेक प्रकल्पांवर गाळपेऱ्याचे प्रमाण वाढत आहे. यात रबी पिकांसह भाजीपाला व डांगराची शेती आढळते. धरणाचे पाणी ओसरू लागताच शेतीला प्रारंभ होतो. नोव्हेंबर-डिसेंबरपासून मार्च-एप्रिलपर्यंत लागवड केली जाते. या कालावधीतच पाणथळ जागांवर स्थानिक, स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांचे प्रमाण वाढलेले असते. काही स्थानिक पाणपक्ष्यांचा वीणकाळ फेब्रुवारी ते मे-जून असल्याने दरवर्षी वीण धोक्यात येत पाणपक्ष्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. नदीसुरय (रिव्हर टर्न), छोटा सुरय (लिटील टर्न), छोटा आर्ली (स्मॉल प्रॉटीनकोल), शेकाट्या (ब्लॅड वींग्ड स्टील्ट), छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग्ड प्लोअर), लाल गाठीची टिटवी (रेड वॅटल्ड लॅपपींग), रंगती पाणवाला (ग्रेटर पेटेंड स्राईप), केटींगश चिखल्या (केटींश प्लोवर) यासह काही पक्षी पाणथळ जागेजवळ जमिनीवर अंडी घालतात. ती त्यांची संमिश्र वसाहतच असून धरणाच्या बाजूला नव्हे तर मागच्या बाजूला (बॅक वॉटर) वा उथळ क्षेत्रात असते. धरणातील पाण्याखालची जमीन उघडी पडून चिखलाला पडलेल्या पोपड्यांमध्ये विविध जलजीव असतात. ते पाणपक्ष्यांचं खाद्य असतं. ती त्यांची अन्नशोधनाची जागा असते व याच अधिवासात ते अंडी देतात. या वीण वसाहतीतील पक्ष्यांची संख्या शेकड्यांतही असू असते. परवानगी न घेताच गाळपेरा वर्धा : पाणलोट क्षेत्रातून वाहत येणारे पोषक द्रव्य व घटकांमुळे या पाणथळ जागा सुपिक व उत्पादनक्षम असतात. यामुळेच धरणात शेती गेलेले मूळ मालक वारंवार त्या जमिनीकडे वळतात. मूळ मालक करीत नसल्यास इतर कुणीही ती जमीन वाहतात. काही ठिकाणी परराज्यातून वा राज्यातील दूर भागातून आलेले डांगराची शेती करतात. अगदीच तुरळक ठिकाणी संबंधित विभागाकडून पावती फाडून परवानगी घेतली जाते. बहुतांश ठिकाणी अवैधरित्या हे काम चालते. खरीप पिकानंतर स्व-जमिनीकडे दुर्लक्ष करून गाळपेऱ्यासाठी चढाओढ असते. डांगराची शेती करणारे कुटुंबासह येतात. पाच-सहा महिने ते तेथेच असतात. हा मानवी वावर, कुत्रे, गुरे, नांगरणी, रासायनिक फवारणी, मालाची ने-आण, मासेमारी व झिरो फिशींग नेटचा वापर याचा परिणाम पक्षी व त्यांच्या अधिवासावर होतो. अधिवास ऱ्हासामुळे पाणपक्ष्यांची वीण संकटात आल्याचे दिसते. तलाव वा धरणाची मागील बाजू हा अत्यंत नाजुक, महत्त्वाचा व सुक्ष्म अधिवास आहे. गाळपेऱ्यासाठी परवानगी देताना पक्षी अधिवासाचा विचार होणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) गाळपेरा हा वाळू उपस्या इतकाच गंभीर प्रश्न आहे. गाळपेरा नियंत्रित राहावा यासाठी एक सीमारेषा निश्चित करावी. नियमावली तयार करावी. पाणथळीच्या जागांवर होणारे अतिक्रमण रोखणे व त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र पाणथळ जागा संवर्धन कायदा पारित करावा वा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. पाणपक्षी, त्यांचे अधिवास व महत्त्व याबाबत शेतकऱ्यांत जागृतीसाठी पक्षीमित्र, पाटंबंधारे विभाग, वनविभाग यांनी पुढाकार घेतला पाहिजे. - दिलीप वीरखडे, पक्षी अभ्यासक़, वर्धा.