शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

गाळपेऱ्यामुळे पक्ष्यांची वीण धोक्यात

By admin | Updated: March 16, 2017 00:41 IST

धरणाचे पाणी कमी होताच उघड्या पडलेल्या जमिनीवर शेती केली जाते. याला गाळपेरा म्हणतात.

पाणपक्ष्यांची संख्या घटतेय : बहुतांश धरणांवर वाढलाय गाळपेरा वर्धा : धरणाचे पाणी कमी होताच उघड्या पडलेल्या जमिनीवर शेती केली जाते. याला गाळपेरा म्हणतात. या गाळपेऱ्यामुळे पक्ष्यांचे अधिवास मानवी हस्तक्षेपाच्या दबावाखाली येत आहे. परिणामी, काही पाणपक्ष्यांची वीण धोक्यात आली आहे. पोथरा, लालनाला, महाकाळी, अप्पर वर्धा, निम्न वर्धा, कार प्रकल्प, रिधोरा, मदन, डोंगरगाव तलावासह अनेक प्रकल्पांवर गाळपेऱ्याचे प्रमाण वाढत आहे. यात रबी पिकांसह भाजीपाला व डांगराची शेती आढळते. धरणाचे पाणी ओसरू लागताच शेतीला प्रारंभ होतो. नोव्हेंबर-डिसेंबरपासून मार्च-एप्रिलपर्यंत लागवड केली जाते. या कालावधीतच पाणथळ जागांवर स्थानिक, स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांचे प्रमाण वाढलेले असते. काही स्थानिक पाणपक्ष्यांचा वीणकाळ फेब्रुवारी ते मे-जून असल्याने दरवर्षी वीण धोक्यात येत पाणपक्ष्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. नदीसुरय (रिव्हर टर्न), छोटा सुरय (लिटील टर्न), छोटा आर्ली (स्मॉल प्रॉटीनकोल), शेकाट्या (ब्लॅड वींग्ड स्टील्ट), छोटा कंठेरी चिखल्या (लिटील रिंग्ड प्लोअर), लाल गाठीची टिटवी (रेड वॅटल्ड लॅपपींग), रंगती पाणवाला (ग्रेटर पेटेंड स्राईप), केटींगश चिखल्या (केटींश प्लोवर) यासह काही पक्षी पाणथळ जागेजवळ जमिनीवर अंडी घालतात. ती त्यांची संमिश्र वसाहतच असून धरणाच्या बाजूला नव्हे तर मागच्या बाजूला (बॅक वॉटर) वा उथळ क्षेत्रात असते. धरणातील पाण्याखालची जमीन उघडी पडून चिखलाला पडलेल्या पोपड्यांमध्ये विविध जलजीव असतात. ते पाणपक्ष्यांचं खाद्य असतं. ती त्यांची अन्नशोधनाची जागा असते व याच अधिवासात ते अंडी देतात. या वीण वसाहतीतील पक्ष्यांची संख्या शेकड्यांतही असू असते. परवानगी न घेताच गाळपेरा वर्धा : पाणलोट क्षेत्रातून वाहत येणारे पोषक द्रव्य व घटकांमुळे या पाणथळ जागा सुपिक व उत्पादनक्षम असतात. यामुळेच धरणात शेती गेलेले मूळ मालक वारंवार त्या जमिनीकडे वळतात. मूळ मालक करीत नसल्यास इतर कुणीही ती जमीन वाहतात. काही ठिकाणी परराज्यातून वा राज्यातील दूर भागातून आलेले डांगराची शेती करतात. अगदीच तुरळक ठिकाणी संबंधित विभागाकडून पावती फाडून परवानगी घेतली जाते. बहुतांश ठिकाणी अवैधरित्या हे काम चालते. खरीप पिकानंतर स्व-जमिनीकडे दुर्लक्ष करून गाळपेऱ्यासाठी चढाओढ असते. डांगराची शेती करणारे कुटुंबासह येतात. पाच-सहा महिने ते तेथेच असतात. हा मानवी वावर, कुत्रे, गुरे, नांगरणी, रासायनिक फवारणी, मालाची ने-आण, मासेमारी व झिरो फिशींग नेटचा वापर याचा परिणाम पक्षी व त्यांच्या अधिवासावर होतो. अधिवास ऱ्हासामुळे पाणपक्ष्यांची वीण संकटात आल्याचे दिसते. तलाव वा धरणाची मागील बाजू हा अत्यंत नाजुक, महत्त्वाचा व सुक्ष्म अधिवास आहे. गाळपेऱ्यासाठी परवानगी देताना पक्षी अधिवासाचा विचार होणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी) गाळपेरा हा वाळू उपस्या इतकाच गंभीर प्रश्न आहे. गाळपेरा नियंत्रित राहावा यासाठी एक सीमारेषा निश्चित करावी. नियमावली तयार करावी. पाणथळीच्या जागांवर होणारे अतिक्रमण रोखणे व त्यांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र पाणथळ जागा संवर्धन कायदा पारित करावा वा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. पाणपक्षी, त्यांचे अधिवास व महत्त्व याबाबत शेतकऱ्यांत जागृतीसाठी पक्षीमित्र, पाटंबंधारे विभाग, वनविभाग यांनी पुढाकार घेतला पाहिजे. - दिलीप वीरखडे, पक्षी अभ्यासक़, वर्धा.