शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नापिकीमुळे शेतकरी उदासीन

By admin | Updated: December 21, 2014 23:05 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली.

वर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्या पिकांचा श्वापदे फडशा पाडू लागली आहेत. त्यामुळे नापिकीमुळे थंडी वाढत असतानाही गावखेड्यात उदासिनतेचे वातावरण आहे.गावखेड्यांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून सुगीच्या दिवसाला प्रारंभ होतो. पूर्वी या दिवसात ज्वारीचे कणीस चवदार व्हायचे. हळूहळू थंडीचा पारा वर चढायचा. त्यामुळे हुरडा सर्वत्र नजरेस पडायचा याच काळात कपाशीच्या झाडाला आलेली बोंडे उमलून शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरी येण्याची प्रक्रियादेखील सुरू व्हायची. दसरा, दिवाळी या सणांचा आनंद आणि घरी येणारे पीक यामुळे उत्साहाचे वातावरण राहत होते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात सणांची धूम व पिकाची आवक वातावरण प्रसन्न करणारी असायची. परंतु १० वर्षाअगोदरचा हा काळ आता दिसत नाही. बीटी बियाण्याची पेरणी गेल्या ५ वर्षात वाढल्याने परिस्थिती बदलली. आता सप्टेंबर, आॅक्टोबर महिना निघून जातो तरी शेतकऱ्यांच्या घरी पांढरे सोने येत नाही. गेल्या गेल्या दोन वर्षात निसर्गाने केलेला लहरीपणा शेतकऱ्यांना तारण्याऐवजी मारणारा ठरला.मागील वर्षी ओला दुष्काळ या वर्षी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला. विलंबाने झालेल्या पेरणीमुळे सर्वच शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. आर्थिक अडचणीत असलेला बळीराजा तुटला. नंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे सोयाबीन या पिकाची परिपूर्ण वाढ झाली नाही. शेवटी उत्पादनात घट झाली. सर्वच शेतकऱ्यांना एक ते दीड क्विंटल इतकेच सोयाबीनची उतारा मिळाला. अनेकांनी सोयाबीनची सवंगणी व मळणी करण्याचे टाळले. नगदीचे पीक हातून गेल्याने बळीराजा व्यथित झाला असताना कपाशीच्या पिकाचीदेखील उतारा तितकासा नाही. एक एकर शेतीच्या लागवडीपासून कापूस वेचाईपर्यंत १२ हजार रूपये खर्च येतो. आजच्या घडीला झालेल्या एकरी ३ क्विंटल कापाचे उत्पन्न म्हणजे झालेला खर्च न निघणारे आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णच खचला आहे. खरीप हंगामात हाती काहीही लागले नाही. म्हणून रब्बी हंगामावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. उसणवारीवर पैसे आणून गहू, चणा या पिकांची लागवड केली. पीक जेमतेम अवस्थेत असताना श्वापदांनी त्या पिकांचा फडशा पाडायला प्रारंभ केला. त्यातच थंडीचा मारा वाढल्यामुळे बाल्यावस्थेत असलेले चण्याचे पीक आता पिवळे पडू लागले. नापिकी, कर्जबाजारीपणा व वारंवार निसर्गाचा बदलणारा रंग गावखेड्यात उदासिनता निर्माण करणारा ठरला. या अधिवेशनात तरी शेतकऱ्यांना काही मिळावे अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे. (शहर प्रतिनिधी)