शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

नापिकीमुळे शेतकरी उदासीन

By admin | Updated: December 21, 2014 23:05 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली.

वर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगाम हातचा गेला. सोयाबीन व कपाशीचे उत्पन्न नाहीच्या बरोबर असताना तुरीचे पीक होण्याची शाश्वती नाही. रबी हंगामातील गहू, चणा या पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्या पिकांचा श्वापदे फडशा पाडू लागली आहेत. त्यामुळे नापिकीमुळे थंडी वाढत असतानाही गावखेड्यात उदासिनतेचे वातावरण आहे.गावखेड्यांमध्ये सप्टेंबर महिन्यापासून सुगीच्या दिवसाला प्रारंभ होतो. पूर्वी या दिवसात ज्वारीचे कणीस चवदार व्हायचे. हळूहळू थंडीचा पारा वर चढायचा. त्यामुळे हुरडा सर्वत्र नजरेस पडायचा याच काळात कपाशीच्या झाडाला आलेली बोंडे उमलून शेतकऱ्यांचे पांढरे सोने घरी येण्याची प्रक्रियादेखील सुरू व्हायची. दसरा, दिवाळी या सणांचा आनंद आणि घरी येणारे पीक यामुळे उत्साहाचे वातावरण राहत होते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यात सणांची धूम व पिकाची आवक वातावरण प्रसन्न करणारी असायची. परंतु १० वर्षाअगोदरचा हा काळ आता दिसत नाही. बीटी बियाण्याची पेरणी गेल्या ५ वर्षात वाढल्याने परिस्थिती बदलली. आता सप्टेंबर, आॅक्टोबर महिना निघून जातो तरी शेतकऱ्यांच्या घरी पांढरे सोने येत नाही. गेल्या गेल्या दोन वर्षात निसर्गाने केलेला लहरीपणा शेतकऱ्यांना तारण्याऐवजी मारणारा ठरला.मागील वर्षी ओला दुष्काळ या वर्षी कोरडा दुष्काळ शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला. विलंबाने झालेल्या पेरणीमुळे सर्वच शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. आर्थिक अडचणीत असलेला बळीराजा तुटला. नंतर पावसाने मारलेल्या दडीमुळे सोयाबीन या पिकाची परिपूर्ण वाढ झाली नाही. शेवटी उत्पादनात घट झाली. सर्वच शेतकऱ्यांना एक ते दीड क्विंटल इतकेच सोयाबीनची उतारा मिळाला. अनेकांनी सोयाबीनची सवंगणी व मळणी करण्याचे टाळले. नगदीचे पीक हातून गेल्याने बळीराजा व्यथित झाला असताना कपाशीच्या पिकाचीदेखील उतारा तितकासा नाही. एक एकर शेतीच्या लागवडीपासून कापूस वेचाईपर्यंत १२ हजार रूपये खर्च येतो. आजच्या घडीला झालेल्या एकरी ३ क्विंटल कापाचे उत्पन्न म्हणजे झालेला खर्च न निघणारे आहे. त्यामुळे बळीराजा पूर्णच खचला आहे. खरीप हंगामात हाती काहीही लागले नाही. म्हणून रब्बी हंगामावर शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रीत केले. उसणवारीवर पैसे आणून गहू, चणा या पिकांची लागवड केली. पीक जेमतेम अवस्थेत असताना श्वापदांनी त्या पिकांचा फडशा पाडायला प्रारंभ केला. त्यातच थंडीचा मारा वाढल्यामुळे बाल्यावस्थेत असलेले चण्याचे पीक आता पिवळे पडू लागले. नापिकी, कर्जबाजारीपणा व वारंवार निसर्गाचा बदलणारा रंग गावखेड्यात उदासिनता निर्माण करणारा ठरला. या अधिवेशनात तरी शेतकऱ्यांना काही मिळावे अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करीत आहे. (शहर प्रतिनिधी)