शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते झाले अरूंद

By admin | Updated: February 26, 2015 01:15 IST

शहरातील मुख्य मार्गावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. बाजार मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, बॅँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना

सेलू : शहरातील मुख्य मार्गावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अरूंद झाले आहेत. बाजार मार्गावर वाहनांच्या रांगा लागतात. परिणामी, बॅँकेत व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना व नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ग्राहकांची होत असलेली गैरसोय होत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी या भागात येणाऱ्या नागरिकांना करावी लागत आहे. येथील बाजार मार्गावर बॅँक आॅफ इंडियात ग्राहकांची वर्दळ असते. बाजारओळीत ही बॅँक असल्याने रस्त्याच्या दुतर्फा या मार्गावर नेहमी वाहतुकीचा खोळंबा होतो. पार्किंगची व्यवस्था नसल्याने नाइलाजास्तव ग्राहकांना भर रस्त्यावर वाहने उभी ठेवावी लागतात. परिणामी, किरकोळ अपघातसुध्दा घडतात. येथे कोणतीही सुरक्षायंत्रणा नसल्याने वाहन चोरीच्या घटना सुध्दा घडल्या आहेत. बॅँकेत येणाऱ्या ग्राहकांना वाहन ठेवण्यापासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय बाजारात येणाऱ्या नागरिकांनाही या वाहनांच्या रांगाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस विभागाच्यावतीने लक्ष देत वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी या भागात येणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर येथे घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.(तालुका प्रतिनिधी)