शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

महाकाळी पाटबंधारे वसाहतीचे खस्ताहाल

By admin | Updated: January 2, 2017 00:08 IST

ते कारंजा (घा.) मार्गावर तब्बल सात एकरात पसरलेल्या पाटबंधारे विभागाची वसाहत शेवटच्या घटका मोजत आहे;

प्रशासनाचे दुर्लक्ष : भिंती पडण्याच्या मार्गावर, झुडपांसह कचऱ्यांचे साम्राज्य अरविंद काकडे  आकोली खरांगणा (मो.) ते कारंजा (घा.) मार्गावर तब्बल सात एकरात पसरलेल्या पाटबंधारे विभागाची वसाहत शेवटच्या घटका मोजत आहे; पण ढिम्म प्रशासन दुखभाल, दुरूस्तीकडे लक्ष देत नाही, ही शोकांतिका आहे. अंगणवाडी व शाळा नव्याने बांधण्यात आल्याने सुस्थितीत आहे. निवासस्थाने मात्र मोडकळीस आलीत. काही जमीनदोस्तही झालीत. या इमारतीत लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. महाकाळी धरणाची निर्मिती झाली तेव्हा तेथे कार्यरत वर्ग १ ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची निवासाची सोय व्हावी म्हणून १९७७-७८ मध्ये कारंजा रस्त्यावर वसाहत उभी करण्यात आली. जवळपास ३०-३५ क्वॉर्टर येथे बांधण्यात आले होते. शिवाय कार्यालय व साहित्य ठेवण्याकरिता गोदाम बांधण्यात आले होते. येथे सेवेत कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचारी राहत असून जवळचा पैसा खर्च करून वेळोवेळी निवासस्थानाची डागडुजी केल्याने काही निवासस्थाने वरपांगी सुस्थितीत दिसत असली तरी ते कधी कोसळतील, याचा भरवसा नाही. एवढ्या विर्स्तीण जागेत बांधलेल्या वसाहतीत व्यवस्थित रस्तेही नाही. शौचालय नाही. इतकेच नव्हे तर ज्या काचनूर ग्रामपंचायतमध्ये ही वसाहत येते, ती ग्रामपंचायत विहिरीत ब्लिचिंग टाकत नसल्याच्या तेथील नागरिकांच्या तक्रारी आहेत. पथदिव्यांची कुठलीही व्यवस्था नाही. ब्लिचिंग पावडर वर्गणी करून खरेदी केले जाते तर साफसफाईची जबाबदारी युवक सांभाळतात. राहायला व्यवस्थित निवास्थाने नसल्याने अनेक कर्मचारी खरांगणा, वर्धा व आर्वी येथे वास्तव्य करतात. पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे वसाहतीवर अवकळा आली आहे. मोडकळीस आलेल्या येथील निवासस्थानांची स्व-खर्चाने किती वेळा दुरूस्ती करावी, असा प्रश्न येथील कर्मचारी उपस्थित करीत आहेत. हस्तांतरणाचा प्रस्ताव अद्याप धूळखात वसाहतीच्या एका बाजूला सेवानिवृत्त कर्मचारी राहतात. ते राहत असलेली ०.८३ जागा पाटबंधारे विभागाने महसूल विभागाला हस्तांतरणाचा प्रस्ताव दिला. जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांची मंजुरी झाली. जिल्हाधिकारी यांनीही १९ डिसेंबर २०१५ रोजी सदरची ०.८३ हे आर. जागा हस्तांतर करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मालकीचे पट्टे देण्याबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार आर्वी यांना पत्र देण्यात आले. शिवाय प्रकरण त्वरित निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या; पण एक वर्ष होत असताना कुठलीही हालचाल प्रशासकीय स्तरावरून झाली नाही. यामुळे जीर्ण झालेल्या निवास्थानाची दुरूस्ती करावी की करू नये, असा विचार येथील रहिवासी करीत आहेत. मोठा अपघात होण्यापूर्वी प्रशासनाने निवास्थानाची नव्याने निर्मिती करणे तथा जागा हस्तांतरणाचा प्रस्ताव त्वरित मंजूर करून पट्टे देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. दुरूस्तीचा खर्चही मोठा महाकाळी पाटबंधारे वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वत:च्या खर्चाने तेथील निवासस्थानांची दुरूस्ती करावी लागते. दरवर्षी यासाठी मोठा खर्च करावा लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ३५ वर्षांपूर्वीची घरे सध्या जीर्ण झाली असून त्यांची कायम डागडुजी, दुरूस्ती करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. राहुटी असलेल्या नागरिकांना अपघात होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. प्रशासनानेही याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.