शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

बांधकाम साहित्यामुळे वाहनचालकांना डोकेदुखी

By admin | Updated: April 5, 2017 00:43 IST

शहरासह शहरानजीकच्या ग्रामीण भागात नागरिकांकरवी ठिकठिकाणी नवीन इमारती तयार करण्याचे काम सुरू आहे.

रस्ते झाले अरुंद : प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज वर्धा : शहरासह शहरानजीकच्या ग्रामीण भागात नागरिकांकरवी ठिकठिकाणी नवीन इमारती तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने पूर्वीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद झाले आहेत. सदर प्रकारामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे जातीने लक्ष देत कार्यवाही करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शहरातील रामनगर, कृष्णनगर, तुकाराम वॉर्ड, गौरक्षण वॉर्ड, हिंदनगर, मानसमंदिर परिसर आदी भागासह शहरानजीकच्या बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, आलोडी आदी भागात ठिकठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच घरांचे बांधकाम सुरू आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी गिट्टी, रेती, मुरूम, विटा आदी साहित्याची आवश्यकता असते. सदर साहित्य ज्या परिसरात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे तेथील रस्त्यांच्या कडेला टाकल्या जात असल्याचे बघावयास मिळत आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य व बांधकामाचे वेस्टेज मटेरियल वाहनचालकांची व इतर नागरिकांची पर्वा न करता रस्त्याच्या कडेलाच टाकल्या जात आहे. शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावर नवीन बांधकामासाठी वापरणारी गिट्टी, रेती टाकण्यात आल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करतच या रस्त्यांवरून पुढील प्रवास करावा लागत आहे. एकूणच रस्त्यावरील बांधकाम साहित्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)