शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

बालवैज्ञानिक घडविण्यात जिल्हा अग्रेसर

By admin | Updated: November 9, 2014 23:17 IST

विज्ञानाचा उपयोग केवळ मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नाही तर जगाचे व मानवजातीचे कल्याण साध्य व्हावे याकरिता करण्याच्या दृष्टीकोनातून युनेस्कोने शांतता आणि विकासासाठी विज्ञान

श्रेया केने, पराग मगर = वर्धाविज्ञानाचा उपयोग केवळ मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नाही तर जगाचे व मानवजातीचे कल्याण साध्य व्हावे याकरिता करण्याच्या दृष्टीकोनातून युनेस्कोने शांतता आणि विकासासाठी विज्ञान दिनाची सुरूवात केली. विज्ञान ही केवळ समजून घेण्याची बाब नाही तर ती प्रत्यक्षात सिद्ध करण्याची आहे. विज्ञानात प्रात्यक्षिकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हा विचार समोर ठेवूनच जिल्ह्यातील बजाज सायन्स सेंटर काम करीत आहे. या माध्यमातून बालकांवर विज्ञानविषयक संस्कार करुन त्यांच्यातील जिज्ञासेला प्रोत्साहन देत देशाकरिता भावी वैज्ञानिक घडविण्याची ही प्रयोगशाळा ठरत आहे.शिक्षणाचा पाया हा बालपणातच पक्का व्हावा, असे शिक्षणतज्ज्ञ म्हणतात. मुलांमधील चौकस बुद्धीला नवा आयाम देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. विज्ञानाचे प्रयोग केवळ शिकायचे नसतात तर ते प्रत्यक्षात करून बघायचे असतात यावर येथे भर दिला जातो. आज जिल्ह्यातील विद्यार्थी वैज्ञानिक परीक्षांमध्ये सहभागी होत नावलौकीक मिळवत आहे. महाराष्ट्राचेच नाही तर भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे हे केंद्र बालवैज्ञानिक बनविण्याची प्रयोगशाळा म्हणूनच नावारुपास येत असून जिल्हाही बालवैज्ञानिक बनविण्यात अग्रेसर ठरत आहे. विज्ञान विषयात प्रात्यक्षिकाचे महत्त्व पाहता शाळेत विज्ञानाचे प्रात्यक्षिक करून घेतले जात असले तरी अनेकदा शाळेत पुरेसे साहित्य उपलब्ध नसते. शहरातील मोजक्या शाळा सोडल्या तर जिल्ह्यातील बहुतेक शाळांची स्थिती विज्ञान प्रयोगाबाबत तितकीशी पुरक नाही. विज्ञान स्पर्धांच्या काळात मुलांकडून प्रयोग करुन घेतले जातात. शिवाय प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेणे शक्य नसते. मुलांनी कितपत ज्ञान अवगत केले जाणून घेणे अशावेळी शक्य होत नाही. हीच बाब हेरून जिल्ह्यातील गांधी ज्ञान मंदिर ट्रस्टच्यावतीने बजाज सायन्स सेंटरची रुजवात २००७ पासून करण्यात आली. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. परीक्षा घेऊन अत्यल्प प्रवेशशुल्क आकारून परीक्षा पद्धत सुरू करण्यात आली. प्रशस्त वास्तू आणि गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र विषयांसाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बालवैज्ञानिक बनविण्यात जिल्हा अग्रेसर ठरत असल्याचे गत काही वर्षावरून दिसून येत आहे.