शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

वर्धा पालिकेत अपंग कर्मचाऱ्यांची अवहेलना

By admin | Updated: August 3, 2014 23:32 IST

शासनाचा निर्णय असताना नगर परिषदेच्यावतीने कार्यरत असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना पालिकेच्यावतीने अद्याप अर्थसहाय्य दिले गेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वर्धा : शासनाचा निर्णय असताना नगर परिषदेच्यावतीने कार्यरत असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना पालिकेच्यावतीने अद्याप अर्थसहाय्य दिले गेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथील अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेच्या वतीने वर्धा पालिकेत कार्यरत अपंग कर्मचाऱ्यांना स्कुटर विथ अ‍ॅडप्शन तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान संघटनेची मागणी लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.महाराष्ट्र शासनाच्या ८ फेब्रुवारी २०१३ व २८ फेब्रुवारी २०१३ च्या निर्णयानुसार तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग निर्णय क्र. अपंग २०१२/प्र.क्र.३२/अ.क्र.२ १६ मे २०१३ नुसार अपंग कर्मचाऱ्यांना वाहने तसेच सहाय्यक तंत्रज्ञान खरेदीसाठी कमाल ५० हजार रुपये नापरतावा व १५ हजार रुपये परतावा असे एकूण ६५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य वेतन व भत्ते या लेखाशिर्षातून उपलब्ध करून द्यावयाचे आहे. बऱ्याचशा विभागांनी त्यांच्या अधिनस्थ असलेल्या अपंग कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळवून दिला आहे; परंतु अजूनही काही विभाग अपंग कर्मचाऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्याबाबत उदासीन आहे. यामुळे बरेच अपंग कर्मचारी शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेपासून वंचित आहेत.यामुळे महाराष्ट्र राज्य अपंग, कर्मचारी अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय गाढवे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्याधिकारी विजय खोराटे यांची भेट घेऊन निवेदन दिले व चर्चा केली. मुख्याधिकाऱ्यांनी अपंग कर्मचाऱ्यांना तत्काळ गाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात धनंजय खडसे, सुधाकर सराटे, लक्ष्मीकांत तिवारी, दुधबडे, मो. अवेस मो. शकील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.अपंग कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत उदासीन धोरण अवलंबिणाऱ्या अधिकारी व विभागांच्या विरोधात आंदोलन पुकारण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. अपंग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहिष्णू व सहकार्याचे धोरण असणाऱ्या अधिकारी व विभाग यांच्याशी समोपचाराने चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)