शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

लोकसभा निवडणूक खर्चाच्या माहितीला हरताळ

By admin | Updated: June 21, 2014 01:55 IST

राज्य निवडणूक आयोगाद्वारे राज्यभर निवडणूक कार्यक्रम राबविला जातो़ ...

  प्रशांत हेलोंडे वर्धा

राज्य निवडणूक आयोगाद्वारे राज्यभर निवडणूक कार्यक्रम राबविला जातो़ यासाठी प्रत्येक क्षेत्राच्या निवडणूक विभागाला ठराविक निधी पूरविला जातो़ यातील खर्चाचे सादरीकरण करावे, हे अपेक्षित असते; पण वर्धा जिल्हा निवडणूक विभागाने माहिती अधिकारात मागूनही खर्चाची माहिती देण्यास टाळाटाळच केली आहे़ शिवाय निवडणूक निर्णय अधिकारी सुनावणीही घेत नसल्याने नक्कीच निवडणूक खर्चात घोळ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे़ नुकतीच देशातील सर्वोच्च असलेली लोकसभा निवडणूक पार पडली़ वर्धा लोकसभा मतदार संघातील व्यवस्थेकरिता जिल्हा निवडणूक विभागाला निधी पुरविण्यात आला़ यातून संपूर्ण निवडणुकीचा खर्च भागविण्यात आला; पण अद्यापही निवडणुकीचा खर्च जाहीर करण्यात आलेला नाही़ यामुळे आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांनी माहिती अधिकार कायद्याचा आधार घेत निवडणूक खर्चाची तपशीलवार माहिती देण्याची विनंती केली़ यासाठी त्यांनी २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकाराचा अर्ज सादर केला़ यानंतर ३० दिवसांत माहिती मिळणे अपेक्षित होते; पण माहिती देण्यात आली नाही़ यामुळे चौबे यांनी २८ एप्रिल रोजी अपिल दाखल केले़ या अपिलावर ४५ दिवसांच्या आत सुनावणी होणे अपेक्षित होते; पण जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी सुनावणीही घेतली नाही़ ७५ दिवस लोटले असताना माहिती दिली नाही व ५५ दिवस लोटले असताना सुनावणीही होत नसल्याने निवडणूक खर्चाचा ताळमेळच नसून अवास्तव खर्च करण्यात आल्याचा आरोपही होत आहे़ या प्रकारातून जिल्हाधिकारी कार्यालयच माहिती अधिकार अधिनियमाची ऐसीतैसी करीत असल्याचे दिसून येते़ नागपूर माहिती आयुक्तांचे पद रिक्त असल्याने या प्रकरणी मुंबई येथील मुख्य माहिती आयुक्तांकडेच अपिल दाखल करण्यात येणार आहे़ यासाठी संपूर्ण कारवाई पूर्ण करण्यात आली आहे़ मुंबई येथे दाखल अपिलाची सुनावणी वर्धेतील जिल्हाधिकारी कार्यालयात व्हीडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे़ यामुळे आता या प्रकरणात कुठली कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ या मुद्यांची मागितली होती माहिती निवडणुकीत कोणत्या कामाच्या निविदा काढल्या, किती निविदा आल्या, कुणाला कंत्राट दिले व यासाठी किती खर्च लागला़ कोणकोणती स्टेशनरी खरेदी केली, त्याची निविदा काढली असल्यास प्रत व किती खर्च आला़ निवडणुकीसाठी किती खासगी वाहने वापरली व त्यावर किती खर्च आला़ निवडणुकीसाठी किती कर्मचारी लागले व त्यावर किती खर्च आला़ चहा, अल्पोपहार व भोजनाकरिता निविदा काढली काय, त्यावर किती खर्च आला व कंत्राट कुणाला दिले़ निवडणूक निरीक्षकांवर किती खर्च आला व निविदा घेतली होती काय़ याशिवाय निवडणूक कामासाठी किती खर्च आला़ शासकीय यंत्रणा सोडून किती खासगी व्यक्तींकडून कोणती कामे करून घेण्यात आली व त्यावर किती खर्च आला़ नामांकन अर्ज दाखल केल्यापासून १० एप्रिलपर्यंत सर्व उमेदवारांच्या खर्चाचा संपूर्ण तपशील़ आचार संहिता भंग प्रकरणी किती तक्रारी प्राप्त झाल्या, किती जणांवर कारवाई केली याबाबतचे पत्र, आदेशाची प्रत देण्यात यावी़