शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: October 19, 2016 01:24 IST

शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ...

आजारांच्या प्रमाणात वाढ : प्रत्येक घरी आढळतोय किमान एक रुग्णअरुण फाळके  कारंजा (घा.)शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि व्हायरल फिवरचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक घरी किमान एक रुग्ण आढळून येत आहे. शहरातील दवाखाणे फुल्ल आहेत. डॉक्टरांना सुगीचे दिवस आले असून जनता हवालदिल आहे. नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन वॉर्डातील अनेक रिकाम्या खासगी भूखंडांवर प्लॉट मालकाने बांधकाम केले नाही. ले-आऊटमधील सार्वजनिक कामासाठी सोडण्यात आलेल्या रिकाम्या जागेवर नगर पंचायतने तार कुंपण लावले नसल्याने शेजारचे लोक तेथे कचरा आणून टाकतात. शिल्लक अन्न टाकले जाते. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रिकाम्या भूखंडांवर झाडे, झुडपे, गवत वाढले आहे. परिणामी, साप व इतर किटकांचा तसेच डास व माशांचा प्रार्दूभाव वाढला आहे. घाणीमुळे चिकणगुणिया, डेंग्यु, हिवताप, कावीळ आणि व्हायरल आजारांचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे दिसते.यावर नियंत्रण करण्यासाठी नगर पंचायत व आरोग्य विभागाने नियमीत सामूहिक फवारणी करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक घरात वरील प्रकारचा किमान एक तरी रुग्ण दिसून येत आहे. एकाला हा आजार झाला की, पूर्ण घर आजाराने ग्रस्त होते. ताप, डोके, हात, पाय दुखणे व सांध्यामध्ये सुज निर्माण होऊन अत्यंत वेदना होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. जवळपास एक आठवडा रुग्ण कुणाच्या उपयोगी पडत नाही. ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. यापूर्वी ग्रा.पं.ने बांधलेल्या नाल्या उघड्या असल्याने डासांचा त्रास अधिक होतो. नगर पंचायतला शासनाने शहर विकास फंड उपलब्ध करून दिला नसल्याने नाल्यांची दुरूस्ती वा नवीन बंद नाल्यांचे बांधकाम वा इतर कामे नगर पंचायत प्रशासनाला करता आली नाही. जिल्ह्यातील इतर तीन नगर पंचायतींना पाच कोटीचा विकास फंड शासनाने उपलब्ध करून दिला; पण कारंजा नगर पंचायतला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. यामुळे शहर विकासाची सर्व कामे ठप्प आहेत.खासगी रिकाम्या भूखंडांवरील गवत, झाडे, केरकचरा काढण्यासाठी नगर पंचायतने संबंधित प्लॉट धारकांना सूचना देत कार्यवाही करावी. शिवाय नगर पंचायत प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या रिकाम्या सार्वजनिक जागांना तारांचे कुंपण करून भूखंड स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात पसरलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने पुढाकार घेत शहरात स्वच्छता मोहीम राबविणे आणि औषधांची फवारणी करणेही गरजेचे झाले आहे.