शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

रिकाम्या भूखंडांवर घाणीचे साम्राज्य

By admin | Updated: October 19, 2016 01:24 IST

शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि ...

आजारांच्या प्रमाणात वाढ : प्रत्येक घरी आढळतोय किमान एक रुग्णअरुण फाळके  कारंजा (घा.)शहरातील नवीन वॉर्डातील वसाहतीमध्ये रिकाम्या भूखंडांवर गवत, झाडे, केरकचरा वाढला आहे. घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने डास व इतर रोगजंतूचा प्रभाव वाढला. परिणामी, चिकणगुणिया, डेंग्यू, कावीळ आणि व्हायरल फिवरचे प्रमाण वाढले आहे. शहरातील प्रत्येक घरी किमान एक रुग्ण आढळून येत आहे. शहरातील दवाखाणे फुल्ल आहेत. डॉक्टरांना सुगीचे दिवस आले असून जनता हवालदिल आहे. नगर पंचायत प्रशासन व आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन वॉर्डातील अनेक रिकाम्या खासगी भूखंडांवर प्लॉट मालकाने बांधकाम केले नाही. ले-आऊटमधील सार्वजनिक कामासाठी सोडण्यात आलेल्या रिकाम्या जागेवर नगर पंचायतने तार कुंपण लावले नसल्याने शेजारचे लोक तेथे कचरा आणून टाकतात. शिल्लक अन्न टाकले जाते. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या रिकाम्या भूखंडांवर झाडे, झुडपे, गवत वाढले आहे. परिणामी, साप व इतर किटकांचा तसेच डास व माशांचा प्रार्दूभाव वाढला आहे. घाणीमुळे चिकणगुणिया, डेंग्यु, हिवताप, कावीळ आणि व्हायरल आजारांचे प्रमाण शहरात वाढत असल्याचे दिसते.यावर नियंत्रण करण्यासाठी नगर पंचायत व आरोग्य विभागाने नियमीत सामूहिक फवारणी करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक घरात वरील प्रकारचा किमान एक तरी रुग्ण दिसून येत आहे. एकाला हा आजार झाला की, पूर्ण घर आजाराने ग्रस्त होते. ताप, डोके, हात, पाय दुखणे व सांध्यामध्ये सुज निर्माण होऊन अत्यंत वेदना होणे ही लक्षणे दिसून येत आहेत. जवळपास एक आठवडा रुग्ण कुणाच्या उपयोगी पडत नाही. ग्रामीण रुग्णालयासह खाजगी दवाखान्यांतही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. यापूर्वी ग्रा.पं.ने बांधलेल्या नाल्या उघड्या असल्याने डासांचा त्रास अधिक होतो. नगर पंचायतला शासनाने शहर विकास फंड उपलब्ध करून दिला नसल्याने नाल्यांची दुरूस्ती वा नवीन बंद नाल्यांचे बांधकाम वा इतर कामे नगर पंचायत प्रशासनाला करता आली नाही. जिल्ह्यातील इतर तीन नगर पंचायतींना पाच कोटीचा विकास फंड शासनाने उपलब्ध करून दिला; पण कारंजा नगर पंचायतला जाणीवपूर्वक डावलण्यात आले. यामुळे शहर विकासाची सर्व कामे ठप्प आहेत.खासगी रिकाम्या भूखंडांवरील गवत, झाडे, केरकचरा काढण्यासाठी नगर पंचायतने संबंधित प्लॉट धारकांना सूचना देत कार्यवाही करावी. शिवाय नगर पंचायत प्रशासनाच्या अधिकारात असलेल्या रिकाम्या सार्वजनिक जागांना तारांचे कुंपण करून भूखंड स्वच्छ ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरात पसरलेल्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगर पंचायत प्रशासनाने पुढाकार घेत शहरात स्वच्छता मोहीम राबविणे आणि औषधांची फवारणी करणेही गरजेचे झाले आहे.