शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

मृगाची चाहुल, शेतकर्‍यांचा जीव टांगणीला

By admin | Updated: June 2, 2014 01:40 IST

मृगाची चाहुल लागली. तप्त करणार्‍या उन्हात हलक्या पावसाच्या सरीने

 

सेलू : मृगाची चाहुल लागली. तप्त करणार्‍या उन्हात हलक्या पावसाच्या सरीने वातावरणात बदल केला. भरपूर पाऊस झाल्याशिवाय उकाडा कमी होणार नाही. शेतकर्‍याला या प्रचंड उकाड्यातही शेतजमिनीवर अखेरचा हात फिरवावा लागत आहे. मशागत करताकरताच त्याला मृग बरसला तर पेरणीची सोय नाही या विवंचनेने त्याच्या जिवाची आता चांगलीच काहिली होत आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडाली. सोसायटीचे कर्ज मिळायला नाही. राष्ट्रीयकृत बँक कर्ज देईल परंतु सोसायटीचे कर्ज थकीत आहे. ते दिल्याशिवाय राष्ट्रीयकृत बँक उभे करीत नाही. बियाण्यांचे भाव प्रचंड वाढले आहे. शेतकर्‍यांनी घरचे दाणेदार सोयाबीन नाममात्र भावात विकले. तेच आता दर्जेदार बियाणे म्हणून तिपट्ट किमतीत शेतकर्‍यांना खरेदी करण्याची वेळ आली. कपाशीच्या बियाण्यांचे भावही हात लावू देत नाही. खिशात पैसा नाही. बँकाचे, सोसायटीचे कर्ज थकीत आहे. अशात शेतकर्‍यांना शेती उभी करण्यासाठी मोठ्या दिव्यातून जावे लागत आहे.

लावणीचा हंगाम तोंडावर आला आहे. बी-बियाणे, खते खरेदी करण्याची शेतकर्‍यांची लगबग सुरु आहे. कर्जासाठी बँकेत गर्दी वाढत आहे. मात्र थकबाकीदार कर्जदारांना मृगाची चाहूल अस्वस्थ करीत आहे. या आठवड्यात दणकेदार पाऊस होईल असा शेतकर्‍यांना आशावाद आहे. पाऊस झाला की पेरणीसाठी सज्ज व्हावे लागते; मात्र हातात पैसा नसल्याने काळ्या मातीत बी टाकायचे कसे, या विवंचनेने अनेक शेतकर्‍यांचा आतून गळा घोटला जात आहे.

उन्हातान्हात शेतात राबताना विवंचनेपायी त्यांचे डोके ठिकाणावर नाही. शेतीसाठी कशी तडजोड करायची या प्रयत्नात सावकाराशिवाय पर्याय दिसत नाही. अव्वाच्या सव्वा दराची रक्कम सावकार म्हणेल त्या अटीवर शेतकर्‍यांना घेऊन शेती फुलविण्याची वेळ आली आहे.

अडचणीचा फायदा घेऊन सावकार त्याच्या सोयीने कागदपत्र तयार करतो. प्रसंगी शेताचे विक्रीपत्र करुन घेतो. यासाठी येणारा सर्व खर्च शेतकर्‍याच्या माथी मारुन दरसाल दर शेकडा भाव पक्का करुन तुटपुंजी रक्कम त्याच्या हातावर ठेवली जाते. गरज पडल्यास पुन्हा नेण्याचा सल्लाही दिला जातो. इच्छा नसताना शेतकर्‍यांना हा अवैध करार करण्याची वेळ येते. शासन शेतकर्‍यासाठी कितीही योजना राबवीत असले तरी झारीतील शुक्राचार्य त्या कुडतडून कुडतडून खावून उरलेले तुकडे शेतकर्‍यांपुढे टाकतात. त्यामुळे शासनाच्या विविध योजनेचा शेतकर्‍यांना थेट फायदा होत नाही ही खरी शोकांतिका आहे. गरजवंत शेतकर्‍यासाठी असलेल्या योजना संबंधित अधिकारी ज्या शेतकर्‍यांशी सलोख्याचे संबंध आहे त्यांनाच देतात. कृषी विभागाने वाटप केलेले साहित्य किती गरीब व गरजवंत शेतकर्‍यांना वाटले याचा विचार तालुका कृषी अधिकार्‍यांनी केला पाहिजे, मात्र त्यांच्या हाताखालील कर्मचारीही त्यांच्याच विचाराचे झाल्याने चांगल्या योजनांचा बट्याबोळ सुरु आहे.

गत वर्षी पावसाने झोडपले. यंदातरी निसर्गाने साथ द्यावी. तसेच शासनानेही मदतीचा हात द्यावा अशी आशा शेतकरी लावून बसला असून मरगळ झटकून नव्या हंगामाच्या तयारीला लागला असल्याचे दिसत आहे.(तालुका प्रतिनिधी)