शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

४० गावांत ६५९ हेक्टरमधील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 06:00 IST

कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे.

ठळक मुद्देनुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता : नदी-नाले तुडूंब

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : मागील पंधरवड्यापासून आर्वीसह तालुक्यात संततधार पावसाने कहर केल्याने तालुक्यातील ४० गावांतील ६५९ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तालुका कृषी विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.अतिवृष्टीचा आर्वीसह तालुक्यातील बाजारवाडा, नांदपूर, खुबगाव, अहमदपूर, लाडेगाव, एकलारा, शिरपूर, देऊरवाडा, लाडेगाव, सर्कसपूर, राजापूर, अहिरवाडा, मारोडा, धनोडी, वर्धमनेरी, मांडला, सावळापूर, दहेगाव (मु.), हरदोली, रोहणा, वडगाव (पांडे), गुमगाव, नांदोरा, पाचेगाव, धनोडी, कवाडी, गव्हाणखेडी, पिंपळखुटा चिंचोली (डांगे), पाचोड, टाकरखेड, जळगाव, वाढोणा, निंबोली (शेंडे), इठलापूर, वागदा, वाढोणा, अल्लीपूर, टोणा आदी गावांना फटका बसला आहे. यात नदीकाठच्या शेतातील पिके पुराच्या पाण्याने खरडून गेल्याने नुकसानीची आकडेवारी अधिक आहे. कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ६५९ हेक्टर मधील कापूस, सोयाबीन, तूर, फळवर्गीय पिके आदींचा समावेश आहे. कृषी विभागाने केलेल्या संयुक्त सर्व्हेत ४० गावांचा समावेश असून शेतकरी संख्या ७२० आहे. या सततच्या पावसाने कपाशीचे पीक पिवळे पडले असून पात्या गळून पडल्या आहे. अतिपाण्याने तूर पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. या पावसाने तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहे. कृषी विभागाने पाठविलेल्या शेतपिकाच्या नुकसानीच्या सर्व्हेत वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे आर्वी तालुक्यातील ४० गावांतील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले आहे. नुकसानीच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.- प्रशांत गुल्हाणे, तालुका कृषी अधिकारी, आर्वी.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर