शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

पांदण रस्त्यांमुळे पडीत शेती लागवडीखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:20 IST

शेतीसाहित्याची वाहतूक करण्याकरिता पांदण रस्ते उपयोगात येतात. ग्रामीण भागात पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतात जायला अनेक शेतक-यांना रस्ताच उरला नव्हता. त्यामुळे अनेकांची शेती पडीत राहायची.

ठळक मुद्देशेतातील रस्ते अतिक्रमणमुक्त : वाहतुकीचा मार्ग सुकर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतीसाहित्याची वाहतूक करण्याकरिता पांदण रस्ते उपयोगात येतात. ग्रामीण भागात पांदण रस्त्यांवर अतिक्रमण झाल्याने शेतात जायला अनेक शेतक-यांना रस्ताच उरला नव्हता. त्यामुळे अनेकांची शेती पडीत राहायची. पालकमंत्री अतिक्रमणमुक्त पांदण रस्ते योजनेत वर्धा जिल्ह्यातील २३१ किलोमीटरच्या रस्त्यांवरील अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केल्याने ४३२ हेक्टर शेती ही केवळ रस्ता उपलब्ध झाल्यामुळे लागवडीखाली आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी येत होत्या. शेतात जाण्या- येण्यासाठी रस्ता करून दिल्यास शेती करता येईल, रस्ता नसल्यामुळे शेतीसाठी येणाऱ्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रत्येक दौºयात शेतकरी सांगायचे. मे २०१७ मध्ये जिल्ह्यात पालकमंत्री अतिक्रमणमुक्त पांदण रस्ते ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये गावातील शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर अर्ज करून मागणी नोंदविण्यास  कळविण्यात आले. त्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभागाची रक्कमसुद्धा आॅनलाईन भरली. ही प्रक्रिया झाल्यानंतर तलाठी यांनी गाव आराखड्यात दाखविल्याप्रमाणे रस्त्यावर झालेले  अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आखणी केली. जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण काढून रस्त्यात असलेली झुडपे तोडून रस्ता वाहिवाटीसाठी मोकळा करून देण्यात आला. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी वाहून जाण्यासाठी नाली तयार करण्यात आली.  रस्ता मजबूत करण्यासाठी रोलर फिरवून त्याचे सपाटीकरण करण्यात आले.  त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात बैलगाडी, ट्रॅक्टर, मोटरसायकल नेण्यासाठी रस्ता तयार झाला. ४३२ हेक्टर क्षेत्र जे रस्ता उपलब्ध नसल्यामुळे पडीत होते, ते नव्याने लागवडीखाली आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळत असून पडीत जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी लागवडीखाली आल्यामुळे उत्पन्नात वाढ झाली आहे. यासाठी लोकसहभाग  आणि जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वापरण्यात आला आहे.३,९४१ हे. शेतीसाठी रस्त्यांची सुविधा१ वर्षात जिल्ह्यात २३२ किलोमीटर पांदण रस्ते अतिक्रमणमुक्त होण्यासोबतच वहिवाटीसाठी तयार झाले आहेत. योजनेला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. केवळ ६ महिन्यांत ३४९ गावांनी यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी  २२२ गावांनी यासाठी ४१ लाख ७३ हजार ५०० रुपये  लोकसहभागाची  रक्कम जमा केली. त्यापैकी १४७ गावांतील रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये १०० ग्रामपंचायतींचा समावेश आहे.  यामुळे ८ हजार ८१० शेतकऱ्यांच्या ३ हजार ९४१ हेक्टर शेतीसाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकagricultureशेती