शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

९३,८१५ हेक्टरवर होणार पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.

ठळक मुद्देरबीच्या क्षेत्रात २७ हजार हेक्टरने वाढीची शक्यता : गत वर्षी होते एकूण ६६,८८९ हेक्टर पेरणीक्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसाचा चांगला फटकाच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला. असे असले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओलावा कायम आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वच जलाशय फुल्ल झाले आहेत. त्यामुळे यंदा रबीचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता असून रबी हंगामात ९३ हजार ८१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. खरीपात झालेल्या नुकसानाची भरपाई काढण्यासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबी हंगामासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदा रबीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी रबी हंगामात ६६ हजार ८८९ हेक्टरवर शेतकºयांनी गहू, चणा आदी पिकांची लागवड केली होती. तर यंदा जिल्ह्यात ९३ हजार ८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.४७,८६२ क्विंटल बियाणे लागणारयंदा ९३,८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होणार असल्याचा कयास कृषी विभागाचा असून त्याकरिता किती बियाणे लागेल याचा अंदाज काढण्यात आला आहे. रबी हंगामात एकूण ४७ हजार ८६२ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार असून आतापर्यंत अडीच हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात चणा बियाण्याचा समावेश आहे. तर येत्या काही दिवसांत गव्हासह इतर विविध बियाणे प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.यंदा खतकोंडी होणार नाहीचसध्यास्थितीत जिल्ह्यात २५ हजार मेट्रीक टन खत आहे. शिवाय रबी हंगामासाठी वेळीच खताचा साठा जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे यंदा रबी हंगामात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात खतकोंडी होणार नसल्याचे कृषी बोलले जात आहे.रबी हंगामात लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज असला तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण खत, बियाणे कमी पडू नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. तसेच विशेष प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे सध्या मुबलक प्रमाणात बियाणे आणि खत जिल्ह्यात आहे.- अभय चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती