शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

९३,८१५ हेक्टरवर होणार पिकांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.

ठळक मुद्देरबीच्या क्षेत्रात २७ हजार हेक्टरने वाढीची शक्यता : गत वर्षी होते एकूण ६६,८८९ हेक्टर पेरणीक्षेत्र

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसाचा चांगला फटकाच जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना बसला. असे असले तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीत बऱ्यापैकी ओलावा कायम आहे. शिवाय जिल्ह्यातील सर्वच जलाशय फुल्ल झाले आहेत. त्यामुळे यंदा रबीचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता असून रबी हंगामात ९३ हजार ८१५ हेक्टरवर विविध पिकांची लागवड होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.कोरोना संकट काळाला न जूमानता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कर्ज काढून आणि उसणवारीने पैसे मिळून शेतजमिन कसली. सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या पिकांसाठी संजीवणी ठरला. परंतु, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन आणि कपाशी पिकाला चांगलाच फटका बसला. शिवाय यंदा सोयाबीनच्या उताऱ्यात कमालीची घट येत असल्याचे शेतकरी सांगतात. खरीपात झालेल्या नुकसानाची भरपाई काढण्यासाठी सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रबी हंगामासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे यंदा रबीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी रबी हंगामात ६६ हजार ८८९ हेक्टरवर शेतकºयांनी गहू, चणा आदी पिकांची लागवड केली होती. तर यंदा जिल्ह्यात ९३ हजार ८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तविली जात आहे.४७,८६२ क्विंटल बियाणे लागणारयंदा ९३,८१५ हेक्टरवर रबी पिकांची लागवड होणार असल्याचा कयास कृषी विभागाचा असून त्याकरिता किती बियाणे लागेल याचा अंदाज काढण्यात आला आहे. रबी हंगामात एकूण ४७ हजार ८६२ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार असून आतापर्यंत अडीच हजार क्विंटल बियाणे जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात चणा बियाण्याचा समावेश आहे. तर येत्या काही दिवसांत गव्हासह इतर विविध बियाणे प्राप्त होईल, असे सांगण्यात आले.यंदा खतकोंडी होणार नाहीचसध्यास्थितीत जिल्ह्यात २५ हजार मेट्रीक टन खत आहे. शिवाय रबी हंगामासाठी वेळीच खताचा साठा जिल्ह्याला मिळणार आहे. त्यामुळे यंदा रबी हंगामात कुठल्याही परिस्थितीत जिल्ह्यात खतकोंडी होणार नसल्याचे कृषी बोलले जात आहे.रबी हंगामात लागवड क्षेत्र वाढेल असा अंदाज असला तरी शेतकऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. कारण खत, बियाणे कमी पडू नये यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. तसेच विशेष प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे सध्या मुबलक प्रमाणात बियाणे आणि खत जिल्ह्यात आहे.- अभय चव्हाण, जिल्हा कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती