शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पीक कर्ज वाटप थांबले; शेतकरी त्रस्त

By admin | Updated: June 20, 2014 00:00 IST

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा

सुकळीच्या बँकेचा प्रताप : शाखा व्यवस्थापकाचे पद १५ दिवसांपासून रिक्तआकोली : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बँक आॅफ इंडियाच्या सुकळी (बाई) शाखेच्या व्यवस्थापकाची बदली करण्यात आली़ १५ दिवस लोटले असताना नवीन अधिकारी रूजू झाले नाही़ यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी कर्ज प्रकरणांचा निपटारा थांबला आहे़ शेतकरी दररोज आशाळभूत नजरेने बँकेने जातात; पण त्यांना कर्ज पुरवठा होत नाही़ बँक व्यवस्थापनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़पावसाळा दारात आला आहे़ शेती मशागतीची कामे पूर्ण झलीत़ काही ठिकाणी पेरण्याही सुरू झाल्यात़ सुकळी (बाई) शाखेचा नियमित कर्जदार शेतकरी पतपुरवठा थांबल्याने रडकुंडीस आला आहे. शाखेत आधीच कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. केवळ तीन कर्मचाऱ्यांवर बँकेचा कारभार चालविला जात आहे. अशातच शाखा व्यवस्थापकाची १५ दिवसांपूर्वी बदली झाली. पीक कर्ज वाटपाचा हंगाम असल्याने बँक प्रशासनाने त्वरित दुसऱ्या अधिकाऱ्याची नियुक्ती करणे गरजेचे होते; पण तसे झाले नाही़ नवीन अधिकारीच येण्याची प्रतीक्षा न करता जुन्या अधिकाऱ्याने येथून काढता पाय घेतला व नवीन अधिकारीही आला नाही़ यामुळे शेतकरी कचाट्यात सापडला आहे.गत १५ दिवसांपासून दररोज कृषी कर्जाची प्रकरणे बँकेत येत आहे; पण कर्ज मंजूर करायला अधिकारीच नाही़ बँकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना कर्ज मंजुरीचे अधिकार नाहीत़ केवळ खात्यात जमा असलेली रक्कम अदा (पे-कॅश) करण्याचाच अधिकार त्यांना आहे. यामुळे सदर अधिकारी, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे़ शेतकऱ्यांचा संताप टाळण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्याचे दिसते़ शेतकरी दररोज बँकेत चकरा मारत आहे; पण उपयोग होत नाही़ कृषी सेवा केंद्रातून उधारीवर बियाणे मिळत नाही. खिशात पैसा नाही. बँकेवर भिस्त होती; पण पेरणीचा हंगाम सुरू होऊनही कर्ज न मिळाल्याने शेतकरी हताश झाला़ परिसरातील शेतकऱ्यांच्या पेरण्या व बियाणे खरेदी यामुळे खोळंबल्याचे दिसते़ बियाणे उपलब्ध असताना शेतकऱ्यांना खरेदी करता येत नाही़ यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा व्यवस्थापक नेमावा किंवा कर्ज प्रकरणांसाठी तात्पुरता अधिकारी पाठवावा, अशी मागणी शेतकऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़(वार्ताहर)