शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा; वर्धेचा पहिल्यांदाच समावेश

By admin | Updated: June 19, 2014 00:11 IST

शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी

हवामानाचा आधार : बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी करावर्धा : शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक उल्हास नाडे आदी उपस्थित होते.सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी केल्यानंतरच सर्व विक्रेत्यांनी बियाण्यांची विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केले़ अतिवृष्टी व पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन बियाण्यांवर विपरित परिणाम झाला़ यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे व उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे़ बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदी करताना दुकानदारांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासली आहे वा नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करताना प्रत्येक लॉटमधील बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच विक्री करावी़ सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी कापसासह इतर पिकांनाही प्राधान्य द्यावे़ उगवण क्षमता असलेले बियाणे खरेदी करावी. असेही जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी यावेळी सांगितले.पीक विमा योजनेचा लाभ घ्यामहाराष्ट्र शासनाने हवामान आधारीत पीक विमा योजनेसाठी राज्यात वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे़ सोयाबीन व कापूस पिकासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ३० जूनपर्यंत या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांचा विमा उतरावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले़ कापूस व सोयाबीन पिकाकरिता वर्धा जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ यात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस यापासून कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांना संरक्षण मिळणार आहे. ही योजना वर्धा जिल्ह्यातील सर्व गावांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची राहणार आहे़ पीक विमा योजनेंतर्गत कापूस पिकासाठी प्रती हेक्टरी १ हजार २४५ रुपये तर सोयाबीन पिकासाठी ७१४.४० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे़ तेवढीच रक्कम शासन अदा करणार आहे़ पीक विम्याच्या संरक्षणात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस झाल्यास नुकसानीबाबत पिकांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षण कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)