शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

पीक विमा; वर्धेचा पहिल्यांदाच समावेश

By admin | Updated: June 19, 2014 00:11 IST

शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी

हवामानाचा आधार : बियाण्यांच्या उगवण क्षमतेची तपासणी करावर्धा : शासनाच्यावतीने हवामान आधारित पीक विमा योजना राबविली जात आहे़ या योजनेत वर्धा जिल्ह्याचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे़ या योजनेच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी उपसंचालक उल्हास नाडे आदी उपस्थित होते.सोयाबीन बियाण्यांच्या उगवण क्षमतेची चाचणी केल्यानंतरच सर्व विक्रेत्यांनी बियाण्यांची विक्री करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एन.नवीन सोना यांनी केले़ अतिवृष्टी व पावसात खंड पडल्यामुळे सोयाबीन बियाण्यांवर विपरित परिणाम झाला़ यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे व उगवण क्षमता असलेले बियाणे उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे़ बाजारात उपलब्ध असलेले सोयाबीन बियाणे खरेदी करताना दुकानदारांनी बियाण्यांची उगवण क्षमता तपासली आहे वा नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करताना प्रत्येक लॉटमधील बियाण्यांची उगवण क्षमता तपासूनच विक्री करावी़ सोयाबीन बियाण्यांची उपलब्धता लक्षात घेऊन शेतकरी बांधवांनी कापसासह इतर पिकांनाही प्राधान्य द्यावे़ उगवण क्षमता असलेले बियाणे खरेदी करावी. असेही जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी यावेळी सांगितले.पीक विमा योजनेचा लाभ घ्यामहाराष्ट्र शासनाने हवामान आधारीत पीक विमा योजनेसाठी राज्यात वर्धा जिल्ह्याची निवड केली आहे़ सोयाबीन व कापूस पिकासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. शेतकरी बांधवांनी ३० जूनपर्यंत या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतातील पिकांचा विमा उतरावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी केले़ कापूस व सोयाबीन पिकाकरिता वर्धा जिल्ह्यात हवामान आधारीत पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे़ यात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस यापासून कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांना संरक्षण मिळणार आहे. ही योजना वर्धा जिल्ह्यातील सर्व गावांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय होणारी नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीमार्फत देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना सक्तीची राहणार आहे़ पीक विमा योजनेंतर्गत कापूस पिकासाठी प्रती हेक्टरी १ हजार २४५ रुपये तर सोयाबीन पिकासाठी ७१४.४० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे़ तेवढीच रक्कम शासन अदा करणार आहे़ पीक विम्याच्या संरक्षणात अति पाऊस, पावसातील खंड, कमी पाऊस झाल्यास नुकसानीबाबत पिकांना विम्याचे संरक्षण मिळणार आहे. विमा संरक्षण कालावधी संपल्यापासून ४५ दिवसांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे़(कार्यालय प्रतिनिधी)