शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

पावसाने पिकांचे नुकसान! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:17 IST

बुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी  जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी  दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना  पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला  आहे. 

ठळक मुद्देपरतीचा पाऊसनदीनाल्यांना पूर, वाहतूक विस्कळीत 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही ठिकाणी  जोरदार तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. मंगळवारी  दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे धाड परिसरात नदी- नाल्यांना  पूर आला आहे. तसेच पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला  आहे. सध्या शेतात सोयाबीन सोंगणीचे काम ठप्प पडले असून, शे तकरी शेतात सुडी लावून ताडपत्री टाकून संरक्षण करण्याचा प्रय त्न करीत आहेत; मात्र वातावरणातील गारव्यामुळे अनेक  ठिकाणच्या सोयाबीन सुडीला अंकुर फुटण्याची शक्यता असून,  शेतकर्‍यांना फटका बसणार आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख  ७८ हजार ३00 हेक्टर सोयाबीनचे क्षेत्र असून, यावर्षी सुरुवा तीला अल्प पावसामुळे अनेक शेतकर्‍यांनी दुबार, तिबार पेरणी  करावी लागली. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील सोयाबीन सोंगणीवर  आले असून, काही परिसरात कापणी करून मळणीसाठी  सोयाबीनच्या गंज्या लावण्यात आल्या आहेत; मात्र जिल्ह्यात  तीन दिवसांपासून आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांवर  पुन्हा संकट कोसळले आहे. पुढच्या आठवड्यात आलेल्या  दिवाळी सणासाठी सोयाबीन सोंगणी करून बाजारात विक्रीसाठी  नेण्याची तयार शेतकरी करीत होते; मात्र अचानक अवकाळी  पाऊस आल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. मंगळवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या जोरदार पावसाने  जिल्हय़ात नदी-नाल्यांना पूर आल्याने गावांमधील जनजीवन  विस्कळीत झाले.   

ताडपत्री विक्रीत वाढजिल्ह्यात तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस येत असल्यामुळे  शेतात उभे असलेले तसेच सोंगून ठेवलेले सोयाबीन खराब होऊ  नये म्हणून शेतकर्‍यांची कसरत सुरू आहे. घरात असलेली  ताडपत्री किंवा प्लास्टिक कापड घेऊन शेतात धाव घेत आहे.  त्यामुळे येथील आठवडी बाजारात ताडपत्रीच्या विक्रीत वाढ  झाली आहे. या अवकाळी पावसाचा फटका ज्यारी किंवा का पसाला बसणार असून, कापासाची प्रतवारी खराब होण्याची  चिन्हे आहेत.