शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

जिल्ह्यात शहरांसह ग्रामीण भागावर काळोखाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 5:00 AM

पथदिव्यांच्या विद्युत देयकापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची ३३.६२ कोटींची थकबाकी असून येत्या काही दिवसांत विद्युत जोडणी कापण्याची मोहीम महावितरण राबविणार असल्याने जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागांवर काळोखाची टांगती तलवार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. पथदिव्यांच्या थकीत विद्युत देयकाची रक्कम मोठी असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पथदिव्यांना महावितरणकडून विद्युत जोडणी देण्यात आली आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या ग्रामपंचायती, नगरपंचायती तसेच नगरपालिकांकडून सध्या पथदिव्यांचे विद्युत देयक वेळीच अदा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे वास्तव आहे. पथदिव्यांच्या विद्युत देयकापोटी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे महावितरणची ३३.६२ कोटींची थकबाकी असून येत्या काही दिवसांत विद्युत जोडणी कापण्याची मोहीम महावितरण राबविणार असल्याने जिल्ह्यातील शहरांसह ग्रामीण भागांवर काळोखाची टांगती तलवार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. पथदिव्यांच्या थकीत विद्युत देयकाची रक्कम मोठी असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या     अडचणीत भर पडली आहे. थकबाकी वसुलीसाठी संबंधितांशी वारंवार पत्रव्यवहारही सूरू आहेत. प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत तसेच नगरपालिकेने वेळीच पथदिव्यांचे थकीत देयक अदा करावे, असे आवाहन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी केले आहे.

वारंवार केला जातोय पत्रव्यवहार-    जिल्ह्यात ५२० ग्रामपंचायती, सेलू, समुद्रपूर, कारंजा (घा.) व आष्टी या चार नगरपंचायती तसेच वर्धा, सिंदी (रेल्वे, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, देवळी या सहा नगरपरिषद आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांचे थकीत विद्युत देयक वेळीच अदा करावे यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांशी वारंवार पत्रव्यवहार केले आहेत. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्था थकीत देयक अदा करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याचे सांगण्यात आले.

महावितरण राबविणार विशेष मोहीम-    पथदिव्यांच्या विद्युत देयकाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. या मोहीम दरम्यान थकबाकी न भरणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पथदिव्यांची विद्युत जोडणी कापली जाणार आहे. त्यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी तयार केला असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :electricityवीज