शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला

By admin | Updated: September 15, 2016 01:05 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती.

प्रकाश कांबळे : संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रावर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती. आपले विचार मांडता येत नव्हते. जाती व्यवस्थेमुळे काही घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्कही नाकारला होता. पण १९५० पासून भारतीय संविधानाने देशातील अस्पृश्यता, वेठबिगारी दूर करून प्रत्यकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा उमरी या गावापासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्र्यंत २१ कार्यक्रम पार पडले आहेत. सेवाग्राम येथून यात्रेचा चौथा टप्पा सुरू करून खरांगणा गोडे, वाघोली, मदनी, करंजी काजी, करंजी भोगे अशी प्रबोधन यात्रा काढण्यात आली. यावेळी कांबळे बोलत होते. महाराष्ट्र अंनिसच्या आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीच्या सहकार्याने प्रा. नूतन माळवी व गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधानाची मुल्ये, अधिकार, कर्तव्ये नागरिकांना कळावी, यासाठी संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा वर्धा जिल्ह्यात काढण्यात आली आहे. याप्रसंगी सुनील सावध, सुरेश बोरकर, पंकज सत्यकार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, वाटचाल व मिळालेले अधिकार याबाबत प्रबोधन केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी संविधानातील पर्यावरणीय घटकांचे सरंक्षण व संवर्धन याविषयी माहिती दिली. संचालन सुनील ढाले, तर आभार भरत कोकावार, भीमसेन गोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. कपिल गोडघाटे, अशोक वेले, अविनाश काकडे, विजय आगलावे आदींनी सहकार्य केले. संजय भगत यांनी प्रबोधन गीत सादर केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)