शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला

By admin | Updated: September 15, 2016 01:05 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती.

प्रकाश कांबळे : संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रावर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती. आपले विचार मांडता येत नव्हते. जाती व्यवस्थेमुळे काही घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्कही नाकारला होता. पण १९५० पासून भारतीय संविधानाने देशातील अस्पृश्यता, वेठबिगारी दूर करून प्रत्यकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा उमरी या गावापासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्र्यंत २१ कार्यक्रम पार पडले आहेत. सेवाग्राम येथून यात्रेचा चौथा टप्पा सुरू करून खरांगणा गोडे, वाघोली, मदनी, करंजी काजी, करंजी भोगे अशी प्रबोधन यात्रा काढण्यात आली. यावेळी कांबळे बोलत होते. महाराष्ट्र अंनिसच्या आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीच्या सहकार्याने प्रा. नूतन माळवी व गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधानाची मुल्ये, अधिकार, कर्तव्ये नागरिकांना कळावी, यासाठी संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा वर्धा जिल्ह्यात काढण्यात आली आहे. याप्रसंगी सुनील सावध, सुरेश बोरकर, पंकज सत्यकार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, वाटचाल व मिळालेले अधिकार याबाबत प्रबोधन केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी संविधानातील पर्यावरणीय घटकांचे सरंक्षण व संवर्धन याविषयी माहिती दिली. संचालन सुनील ढाले, तर आभार भरत कोकावार, भीमसेन गोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. कपिल गोडघाटे, अशोक वेले, अविनाश काकडे, विजय आगलावे आदींनी सहकार्य केले. संजय भगत यांनी प्रबोधन गीत सादर केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)