शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा हक्क दिला

By admin | Updated: September 15, 2016 01:05 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती.

प्रकाश कांबळे : संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रावर्धा : स्वातंत्र्यपूर्व काळात भारतावर जमीनदार व इंग्रजांचे राज्य होते. नागरिकांना मुलभूत आधिकारांवर अनेक बंधने होती. आपले विचार मांडता येत नव्हते. जाती व्यवस्थेमुळे काही घटकांना सन्मानाने जगण्याचा हक्कही नाकारला होता. पण १९५० पासून भारतीय संविधानाने देशातील अस्पृश्यता, वेठबिगारी दूर करून प्रत्यकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे, असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांनी व्यक्त केले.संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा उमरी या गावापासून सुरू करण्यात आली आहे. आतापर्र्यंत २१ कार्यक्रम पार पडले आहेत. सेवाग्राम येथून यात्रेचा चौथा टप्पा सुरू करून खरांगणा गोडे, वाघोली, मदनी, करंजी काजी, करंजी भोगे अशी प्रबोधन यात्रा काढण्यात आली. यावेळी कांबळे बोलत होते. महाराष्ट्र अंनिसच्या आणि विविध परिवर्तनवादी संघटनांच्या समन्वय समितीच्या सहकार्याने प्रा. नूतन माळवी व गजेंद्र सुरकार यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त संविधानाची मुल्ये, अधिकार, कर्तव्ये नागरिकांना कळावी, यासाठी संविधान जनजागृती व पर्यावरण प्रबोधन यात्रा वर्धा जिल्ह्यात काढण्यात आली आहे. याप्रसंगी सुनील सावध, सुरेश बोरकर, पंकज सत्यकार यांनी भारतीय संविधानाची निर्मिती, वाटचाल व मिळालेले अधिकार याबाबत प्रबोधन केले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी संविधानातील पर्यावरणीय घटकांचे सरंक्षण व संवर्धन याविषयी माहिती दिली. संचालन सुनील ढाले, तर आभार भरत कोकावार, भीमसेन गोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी अ‍ॅड. कपिल गोडघाटे, अशोक वेले, अविनाश काकडे, विजय आगलावे आदींनी सहकार्य केले. संजय भगत यांनी प्रबोधन गीत सादर केले. यावेळी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)