शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पाच कोटींसाठी काँग्रेसकडून ‘श्रेय’वाद

By admin | Updated: January 15, 2017 00:42 IST

स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शहीदभूमी आष्टीच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री

भाजप नगरसेवकांकडून निषेध : निविदा प्रक्रिया करण्यास टाळाटाळ अमोल सोटे  आष्टी (श.) स्वातंत्र्य लढ्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शहीदभूमी आष्टीच्या विकासासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाच कोटींचा निधी दिला. यातून ३ कोटी गावातील विकास कामे तर २ कोटी स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळावर खर्च होणार ओह. यातील ३ कोटींच्या कामाची ई-निविदा होऊन भूमिपूजन सत्ताधारी काँग्रेसच्या आमदार व नगराध्यक्षांनी केल्याने श्रेयवादाला तोंड फुटले आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये ९ कामांना कार्यारंभ मिळाला. भूमिपूजनानंतर तब्बल तीन महिने कामे ठप्प पडली आहे. पालकमंत्री येण्यापूर्वीच नगरपंचायतने भूमिपूजन केले. यावर भाजपाचे नेते दादाराव केचे व नगरसेवक काहीच बोलले नाही. केचे यांच्या प्रयत्नांमुळे पालकमंत्र्यांनी निधी दिला, हे वास्तव तालुक्याला माहिती आहे. कालपर्यंत सर्व ‘आॅल वेल’ होते; पण १५ दिवसांपासून काँग्रेसच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जाहीर पोस्टरबाजी सुरू केली. यात निधी आणून कामे केल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यांची गंभीर दखल भाजप नगरसेवकांनी घेतली. त्यांनी नगर पंचायत सभेत आवाज उठविला. तीन कोटींचे भूमिपूजन तुम्ही केले; पण निधी पालकमंत्र्यांनी दिला. याचे श्रेय घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असे भाजप गटनेते अशोक विजयकर यांनी काँग्रेस नगरसेवकांना सुनावले. सोबतच नगर पंचायतच्या बोगस तथा जाणीवपुर्वक रेंगाळत ठेवणाऱ्या समस्यांना त्यांनी वाचा फोडली. यात न.पं. च्या हक्काचा १४ व्या वित्त आयोगाचा १ कोटी ८८ लाख रुपये निधी एक वर्षापासून तसाच पडून का आहे, वर्षभरात एखादा रपटा वा नाली केली काय, रस्ता अनुदानाचे २० लाख रुपये येऊन ६ महिने झाले. यातून रस्ता कामे का केली नाही. नागरी दलित वस्तीच्या विकासाकरिता एक वर्षापासून आलेल्या २१ लाख रुपये निधीची कामे सुरू करण्यास काँग्रेस नगरसेवकांचा अट्टहास आहे. क वर्ग यात्रा स्थळातील कपिलेश्वर देवस्थान टिपरीवाले बाबा देवस्थान, पीरबाबा टेकडी देवस्थानची बंद पडलेली कामे सुरू करण्यासाठी कुठलाही पाठपुरावा केला नाही. नगरपंचायतला जोडलेल्या मौजातील बंद पडलेल्या पांदण दुरूस्तीच्या कामासाठी सत्तारूढ काँग्रेसने काय पाठपुरावा केला. गरीबांच्या निवाऱ्यासाठी असलेल्या घरकूल योजनेची सुरूवात केली नाही. शेतकरी, महिला, अपंग, दलित, आदिवासी व मुस्लीम अल्पसंख्याकांकरिता असलेल्या शासकीय योजनांसाठी वर्षभरात काहीही प्रयत्न केले नाही. काँग्रेसच्या स्वनाम-धन्य नेत्यांनी आधी जनतेला उत्तरे द्यावी, असे आव्हान भाजप नगरसेवकांनी केले आहे.