शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

वृक्षतोडीविरूद्ध नगरसेविकेची पोलिसांत तक्रार

By admin | Updated: July 15, 2016 02:31 IST

पालिका हद्दीतील वृक्षतोड करण्याची कुठलीही परवानगी न घेता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन वृक्षांची कत्तल केली.

सीओंना निवेदन : वीज वितरणवर फौजदारी कार्यवाहीची मागणी हिंगणघाट : पालिका हद्दीतील वृक्षतोड करण्याची कुठलीही परवानगी न घेता वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तीन वृक्षांची कत्तल केली. यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार नगरसेविका कविता भाईमारे यांनी पोलिसांत केली. शिवाय या प्रकरणी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील संत तुकडोजी वॉर्डात भाईमारे परिवाराने वृक्ष लागवड करून त्याची जोपासना केली; पण बुधवारी वीज वितरण कंपनीचे प्रमोद सहारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन वृक्षाच्या मोठ-मोठ्या फांद्या निर्दयीपणे कापल्यात. याबाबत त्यांनी न.प. मुख्याधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे निदर्शनात आले. पालिका हद्दीतील वृक्षतोड करण्यापूर्वी न.प. मुख्याधिकारी यांची परवानगी आवश्यक आहे. यामुळे नियमाचे उल्लंघन झाल्याने या कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे न.प. मुख्याधिकारी हिंगणघाट यांना नगरसेविका भाईमारे यांनी करून संबंधितांवर कार्यवाहीची तक्रार पोलिसांत केली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपये खर्च करून योजना राबविल्या जात आहे. नागरिक व सामाजिक संस्थांचा या कार्यात मोठा सहभाग आहे. पालिकेच्या हद्दीत वृक्षारोपण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे. शहरातील नागरिकांकडून वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धन करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)