शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

लाचखोराची बिनधास्त तक्रार करा, तो जेरबंद होईल अन् कामही होईल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2021 05:00 IST

सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊन तुमचे कामही लवकर होईल, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सरकारी कार्यालये असल्यामुळे या ठिकाणी लाचखोरांवर कारवाईही जोरात सुरू असते. एसबीच्या अंतर्गत तीन वर्षांत तब्बल २० लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून यावर्षी मात्र, केवळ दोघांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. कामासाठी लाच देणारी व्यक्ती काही तरी बेकायदा काम घेऊन आलेली असते. असे काम केल्यास सरकारी अधिकाऱ्याची नोकरी धोक्यात येऊ शकते.  हे लक्षात घेऊन सरकारी अधिकाऱ्यांनी अशी बेकायदा कामे घेऊन येणाऱ्यांच्या विरोधात तक्रारी कराव्यात तसेच एखादा अधिकारीच जर लाचेची मागणी करीत असेल तरी देखील नागरिकांनी बिनधास्तपणे आपली तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी, तुमचे कामही होईल आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाईदेखील होईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता तक्रारी कराव्यात, असे आवाहन लाचलुचपत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. लाच घेणाऱ्यांमध्ये गृहविभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, कामगार विभाग आदी विभागातील सराकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

अडलेले काम पूर्ण होणारच-जे काम पूर्ण करण्यासाठी सरकारी अधिकारी लाच मागेल, ते काम लाच न देताही पूर्ण होईलच. त्यामुळे लवकर काम करण्यासाठी लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. जर सरकारी अधिकारी किंवा बाबू किंवा इतर कुणीही लाचेची मागणी करीत असेल तर थेट एसबीला कळवावे, तुमचे कामही होईल आणि लाचखोरावर कारवाईदेखील होईल.

या क्रमांकावर बिनधास्त करा तक्रार -सरकारी कार्यालयात काम घेऊन गेल्यास जर कुठला अधिकारी काम पूर्ण करण्यासाठी लाच मागत असेल तर त्याला घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क करून थेट तक्रार नोंदवावी. तुमचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तसेच संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होऊन तुमचे कामही लवकर होईल, त्यामुळे नागरिकांनी न घाबरता तक्रार करावी किंवा कार्यालयाशी संपर्क साधावा.

राज्यात एसीबीने सुरु केली हेल्पलाईनnलाचखोरांना पकडण्यासाी मोठ्या प्रमाणात तक्रारदार पुढे यावेत, या हेतूने एसीबीने १०६४ ही टोल फ्री हेल्पलाईन सेवा सुरु केली आहे. राज्यभरात कुणीही २४ तास केव्हाही फोनवर तक्रार नोंदवू शकता.

 

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरण