शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

९२ क्विंटलवर शेतमाल गेला परत

By admin | Updated: July 15, 2016 02:22 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाशवंत शेतमाल विक्री केंद्र असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे बाजार नियमनमुक्त केले.

चर्चेअंती संप मागे: वर्धेत नियमानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाशवंत शेतमाल विक्री केंद्र असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे बाजार नियमनमुक्त केले. शिवाय अडत्यांना व्यापाऱ्यांनी सहा टक्के अडत द्यावी, असा फतवा काढला. शेतकरी हिताचा वाटत असलेल्या या निर्णयामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. गुरूवारी वर्धेतील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग न शेतकऱ्यांना भाजीपाला घेत शहरभर फिरावे लागले. यात काहींनी त्यांचा शेतमाल विकला तर सुमारे ९२ क्विंटलच्यावर शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागला. या प्रकरणी दुपारी बाजार समितीचे संचालक व अडत्यांमध्ये झालेली चर्चा अखेर निर्णयापर्यंत पोहोचली. यात अडत्यांनी व्यापाऱ्यांकडून कमिशन घेण्यास होणार दिला. तर व्यापाऱ्यांनीही त्याला मान्यता दिली. या कमिशनच्या वादातून शेतकरी मुक्त झाला असला तरी त्याला योग्य दर मिळणार अथवा त्याची पिळवणूक होणार हा मुद्दा कायम आहे. या चर्चेअंती अडत्यांनी त्यांचा संप मागे घेतला असून शुक्रवारपासून बाजारात नियमित लिलाव होणार असल्याचे व्यापारी व अडते गटाचे संचालक विजय बंडेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजतापासून शहरात भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना आपला भाजीपाला घेत शहरात भटकंती करावी लागली. वर्धेच्या बजाज चौकातील मुख्य भाजी बाजारातून सुमारे १२ ते १३ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आणला तसाच परत नेला. यामुळे सुमारे ९२ क्विंटलच्यावर भाजीपाला शहरातून परत गेला. १७ ते २० शेतकऱ्यांनी शेतमाल परत नेण्यापेक्षा शहरात विकणे पसंत केले. या शेतकऱ्यांनी शहरातील गोलबाजार, आर्वी नाका परिसरातील किरकोळ व्यापारी तसेच काही ठोक ग्राहकांना आपला भाजीपाला विकला. ठराविक दरामध्ये खरेदी नसल्याने गुरूवारी शहरात भाजीपाला बेभाव विकला गेल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत शहरात सुमारे १०० क्विंटल भाजीपाला शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांमार्फत विकला गेला. मोजक्या ठिकाणीच भाजी मिळत असल्याने ग्राहकांनाही त्रास झाला.(कार्यालय प्रतिनिधी) भाजीबाजारात केवळ अडत्यांची गर्दी व्यापारी शेतमाल खरेदी करणार नाही म्हटल्यावर मुख्य भाजी बाजारात लिलावच झाला नाही. परिणामी, बजाज चौकातील सर्व दुकाने गुरूवारी बंदच होती. केवळ अडतेच बाजारात दिसून येत होते. एक शेतकरी मात्र आपल्या शेतातील निंबू घेऊन त्यांची विक्री करीत असल्याचे दिसून आले. प्रत्येक शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात असलेला माल असा विकू शकत नसल्याच्याच प्रतिक्रीया बाजारात उमटत होत्या.