शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

९२ क्विंटलवर शेतमाल गेला परत

By admin | Updated: July 15, 2016 02:22 IST

राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाशवंत शेतमाल विक्री केंद्र असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे बाजार नियमनमुक्त केले.

चर्चेअंती संप मागे: वर्धेत नियमानुसार व्यापाऱ्यांकडून अडत वर्धा : राज्य शासनाने शेतकऱ्यांना नाशवंत शेतमाल विक्री केंद्र असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे बाजार नियमनमुक्त केले. शिवाय अडत्यांना व्यापाऱ्यांनी सहा टक्के अडत द्यावी, असा फतवा काढला. शेतकरी हिताचा वाटत असलेल्या या निर्णयामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. गुरूवारी वर्धेतील व्यापाऱ्यांनी लिलावात सहभाग न शेतकऱ्यांना भाजीपाला घेत शहरभर फिरावे लागले. यात काहींनी त्यांचा शेतमाल विकला तर सुमारे ९२ क्विंटलच्यावर शेतमाल शेतकऱ्यांना परत न्यावा लागला. या प्रकरणी दुपारी बाजार समितीचे संचालक व अडत्यांमध्ये झालेली चर्चा अखेर निर्णयापर्यंत पोहोचली. यात अडत्यांनी व्यापाऱ्यांकडून कमिशन घेण्यास होणार दिला. तर व्यापाऱ्यांनीही त्याला मान्यता दिली. या कमिशनच्या वादातून शेतकरी मुक्त झाला असला तरी त्याला योग्य दर मिळणार अथवा त्याची पिळवणूक होणार हा मुद्दा कायम आहे. या चर्चेअंती अडत्यांनी त्यांचा संप मागे घेतला असून शुक्रवारपासून बाजारात नियमित लिलाव होणार असल्याचे व्यापारी व अडते गटाचे संचालक विजय बंडेवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तत्पूर्वी सकाळी ८ वाजतापासून शहरात भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना आपला भाजीपाला घेत शहरात भटकंती करावी लागली. वर्धेच्या बजाज चौकातील मुख्य भाजी बाजारातून सुमारे १२ ते १३ शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आणला तसाच परत नेला. यामुळे सुमारे ९२ क्विंटलच्यावर भाजीपाला शहरातून परत गेला. १७ ते २० शेतकऱ्यांनी शेतमाल परत नेण्यापेक्षा शहरात विकणे पसंत केले. या शेतकऱ्यांनी शहरातील गोलबाजार, आर्वी नाका परिसरातील किरकोळ व्यापारी तसेच काही ठोक ग्राहकांना आपला भाजीपाला विकला. ठराविक दरामध्ये खरेदी नसल्याने गुरूवारी शहरात भाजीपाला बेभाव विकला गेल्याचेही शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत शहरात सुमारे १०० क्विंटल भाजीपाला शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांमार्फत विकला गेला. मोजक्या ठिकाणीच भाजी मिळत असल्याने ग्राहकांनाही त्रास झाला.(कार्यालय प्रतिनिधी) भाजीबाजारात केवळ अडत्यांची गर्दी व्यापारी शेतमाल खरेदी करणार नाही म्हटल्यावर मुख्य भाजी बाजारात लिलावच झाला नाही. परिणामी, बजाज चौकातील सर्व दुकाने गुरूवारी बंदच होती. केवळ अडतेच बाजारात दिसून येत होते. एक शेतकरी मात्र आपल्या शेतातील निंबू घेऊन त्यांची विक्री करीत असल्याचे दिसून आले. प्रत्येक शेतकरी आपला मोठ्या प्रमाणात असलेला माल असा विकू शकत नसल्याच्याच प्रतिक्रीया बाजारात उमटत होत्या.