शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

अस्वलाच्या शोधार्थ ‘कोम्बींग आॅपरेशन’

By admin | Updated: January 16, 2017 00:39 IST

सात महिन्यांमध्ये तब्बल आठ शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या अस्वलीच्या शोधार्थ पुन्हा ९ गावांमध्ये

नऊ गावांत ‘सर्च’ : शेतकऱ्यांच्या मळ्यांवर वनरक्षकांची गस्त अमोल सोटे   आष्टी (शहीद) सात महिन्यांमध्ये तब्बल आठ शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या अस्वलीच्या शोधार्थ पुन्हा ९ गावांमध्ये ‘कोम्बींग आॅपरेशन’ सुरू करण्यात आले. एसआरपीच्या २७ जवानांसह क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक, भूल देणारे डॉक्टर अशी ४२ जणांची चमू जंगलामध्ये भटकंती करीत आहे. वन्यप्राणी अस्वल व दोन पिलांनी आष्टी व तळेगाव वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. शोध मोहिमेदरम्यान वारंवार क्षेत्र बदलत आहे. आष्टी क्षेत्रांतर्गत एकूण १३ हजार ५९७ हेक्टर क्षेत्र आहे. वन्यप्राण्यांचा या मोठ्या विस्तृत क्षेत्रात वावर आहे. यातील अस्वलीचाच अधिक त्रास आहे. कोम्बींग आॅपरेशनमध्ये मुबारकपूर, चामला, बोरखेडी, थार, माणिकवाडा, तारासावंगा, जामगाव, किन्ही, मोई या ९ गावांच्या जंगलांचा समावेश आहे. चार दिवसांपर्वूी मुबारकपूर येथील शेतकरी कालोकरवर अस्वलीने हल्ला केला. यामुळे गंभीर अवस्थेत वनविभागाने त्यांना उपचारार्थ अमरावतीला भरती केले. ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत असल्याने अस्वल शोध मोहिमेबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना एसआरपीची मागणी केली. शनिवारपासून नऊ गावांमध्ये ‘कोम्बींग आॅपरेशन’ सुरू करण्यात आले आहे. ८ शेतकऱ्यांवर झाले अस्वलीचे हल्ले मोई मौजात पद्माकर डाखोळे (४०) यांच्यावर २१ जुलै २०१६ मध्ये हल्ला केला. १ आॅगस्ट २०१६ रोजी बोटोणा बिटात प्रल्हाद पवार, १७ आॅगस्ट २०१६ रोजी मोई येथील शेतकरी ज्ञानेश्वर पवार, २२ सप्टेंबर २०१६ रोजी पुंजाराम परतेकी माणिकवाडा, ९ जानेवारी २०१७ रोजी साहेबराव कालोकर मुबारकपूर अशा पाच शेतकऱ्यांवर आष्टी क्षेत्रात अस्वलीने हल्ला केला तर ३ शेतकऱ्यांवर तळेगाव रेंजमधील क्षेत्रात हल्ले चढविलेत.