शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
3
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
4
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
5
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
6
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
7
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
8
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
9
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
10
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
11
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
12
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
13
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
16
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
17
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
18
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री
19
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
20
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...

सात दशकांपासून शहर विकासापासून वंचितच

By admin | Updated: May 4, 2017 00:51 IST

कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले

एकही नवीन उद्योग नाही : जुन्या उद्योगांनाही घरघर, रोजगार संधीची प्रतीक्षा कायमच पुलगाव : कामगारांचे शहर अशी ओळख असलेल्या पुलगाव शहरात सर्व भौगोलिक सुविधा असताना विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचचल्या गेली नाही. त्यामुळे मागील सात दशकात हा परिसर विकासाच्या दृष्टीने उपेक्षितच राहिला आहे. काँग्रेसने विकास होऊ दिला नाही, असे म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून शहराच्या विकासाकरिता कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे शहर वासीयांचे लक्ष लागले आहे. राज्यातील नव्हे तर देशाच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळविणारे सक्षम नेतृत्व या क्षेत्राने दिले आहे. परंतु शहराच्या विकासाकडे मात्र सर्वच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीशांच्या राजवटीत १८८९ साली पुलगाव कॉटन मील व १९४२ साली स्थापन झालेला केंद्रीय दारूगोळा भांडार सोडले तर या भागात सात दशकात कुठलाही दुसरा मोठा उद्योग उभा राहिलेला नाह. मुंबई-हावडा या रेल्वे मार्गावर असणारे कवठा हे गाव इंग्रज राजवटीत जिल्ह्याचे मुख्यालय होते. गावालगतच बारामाही वाहणारी वर्धा नदी आहे. परिसरातील भौगोलिक परिस्थिती पाहून इंग्रज शासनाने १९६५ साली या नदीवर रेल्वे पुलाची निर्मिती करीत या गावाला ‘ब्रीजटाऊन’ पुलगाव हे नाव दिले. पुढे भौगोलिक परिस्थिती व दळणवळणाची व्यवस्था पाहून १८८९ साली नागपूरच्या बुटी परिवाराने येथे कापड गिरणी सुरू करून विकासाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे हा उद्योग भरभराटीस येवून ३ हजार ५०० कामगारांचा मोठा वस्त्रोद्योग झाला. या शहराचे महत्व व उपलब्ध असलेली भौगोलिक परिस्थिती इंग्रजाचा कळली. म्हणूनच त्यांनी १९४२ साली शहरात देशातील सरंक्षण विभागाचा सर्वात मोठे केंद्रीय दारूगोळा भांडाराची स्थापना करून शहराच्या विकासाला काही प्रमाणात दिशा दिली. मात्र गत काही दशकात शहाराच्या विकासाची गती मंदावल्याचे दिसते. पुलगाव येथून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ महामार्ग जातो. मात्र येथे एकही मोठा उद्योग उभारलेला नाही. विकासाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या या शहराचा विकास करणे तर सोडाच मात्र पुलगाव कॉटन मील व नॅरोगेज रेल्वेमार्ग बंद करून शासनाने शहराच्या विकासाला पाने पुसली आहे. या शहरालगत असलेल्या शासकीय पडीत जागेवर औद्योगिक वसाहत स्थापन व्हावी म्हणून तीन दशकापासून शहरावासीयांनी साकडे घातले आहे. परंतु येथील औद्योगिक वसाहतीचे घोडे पेंड खावून पडले ते तीन दशकापाूसन उठलेच नाही. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी अल्प आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथील भौगोलीक सुविधांची उपलब्धता पाहता विकासाची प्रतीक्षा शहरवासीयांना आहे. (तालुका प्रतिनिधी)