शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे

By admin | Updated: July 12, 2014 01:39 IST

कुठल्याही गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासामध्ये नागरिकांनी पोलिसांना योग्य सहकार्य केल्यास...

तळेगाव (श्या़पंत) : कुठल्याही गुन्ह्यांच्या तपासामध्ये नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे तपासामध्ये नागरिकांनी पोलिसांना योग्य सहकार्य केल्यास गुन्ह्यांचा तपास लवकर लागून आरोपींना गजाआड करता येते. असे मत आर्वीचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश बुरडे यांनी व्यक्त केले.तळेगाव पोलीस स्टेशनच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ३९ गावांचा कारभार सांभाळणाऱ्या या पोलीस ठाण्यात एकूण ३८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ठाण्यात आष्टी व कारंजा तालुक्यातील १० तर आर्वी तालुक्यातील नऊ गावांचा समावेश आहे. या कारणाने असलेला कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्यांची खंतही त्यांनी व्यक्त केली. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे या कामात उपयुक्त ठरत आहेत. व्यावसयिकांनी आपल्या प्रतिष्ठानांमध्ये तसेच मंदिर परिसरामध्ये या कॅमेऱ्यांचा उपयोग करावा असे ते म्हणाले. टोलनाक्यावरील कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महामार्गावरील होणारी लुटपाट तसेच अन्य गुन्ह्यांच्या तपासात मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित परिसरातील गावांमधील पोलीस पाटील तसेच तंटामुक्तीचे अध्यक्ष, सदस्य, सरपंच यांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. पोलिसांवर कामाचा ताण असतो. तीही माणसच आहेत. तेव्हा त्यांची मानसिकता समजावून घ्यावी, आपसी सामंजस्यातून आणि सामाजिक भावनेतून विचार करुन गावातील छोटे-मोठे भांडण पोलिसांच्या व तंटामुक्तीच्या माध्यमातून सोडवावे असे आवाहन त्यांनी नागरिकांना व पोलीस पाटलांना केले. प्रास्ताविक व संचालन ठाणेदार दिनेश झामरे यांनी केले. सध्याचे पोलीस स्टेशन हे सा. बां. विभागाच्या भाड्याच्या जागेत आहे. नवीन जागा आणि बांधकामाकरिता लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन हे काम लवकर मार्गी लावावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.(वार्ताहर)