शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वनविभागाच्या ३० एकर जागेवर नागरिकांचा डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 21:23 IST

शहरानजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काही गौणखनिज माफियांनी माती व मुरूची चोरी केल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देअधिकारी कुंभकर्णी झोपेत : काहींनी केली मनमर्जीने गौणखनिजाची चोरी

महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून काही गौणखनिज माफियांनी माती व मुरूची चोरी केल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी हे अतिक्रमण झटपट काढण्यासाठी तसेच उत्खनन माफियांवर कारवाई करण्यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून प्रभावी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग तर घेत नाही ना, असा सवाल सुजाण नागरिकांकडून विचारला जात आहे.प्राप्त माहितीनुसार, मौजा कारला येथील सर्वे क्रमांक ९८ आराजी ३.६४ हेक्टर, सर्वे क्रमांक ९९ आराजी ७.९२ हेक्टर व सर्वे क्रमांक ०.७२ हेक्टर ही जागा महसूल विभागाने काही वर्षांपूर्वी वनविभागाकडे वळती केली. त्याची नोंदही महसूल विभागाने घेतली आहे. मात्र, जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहराशेजारील याच वनविभागाच्या झुडपी जंगल जमिनीवर रामा राजू बागडे, महेंद्र मरजिवे, प्रेमिला प्रल्हाद उईके, सरिता रमेश उईके, लोकराम बाबूलाल बागडे, अनिता गजानन बास्टेकर, अर्चना राजेंद्र लाखे, हेमंत वडस्कर, प्रकाश गव्हारकर, प्रल्हाद गणपत उईके व आणखी ५८ च्यावर व्यक्तींनी अतिक्रमण केले आहे. पूर्वी या जागेवर झुडपी जंगल होते. परंतु, त्या परिसरातील अतिक्रमणधारकांसह काही अवैध वृक्ष कत्तल करणाऱ्यांनी सध्या येथील सागाचेही वृक्ष साफ केल्याचे दिसून येते.इतकेच नव्हे, तर अतिक्रमण करून अनेकांनी त्या जागेवर पक्की घरे बांधली आहेत. तर काहींनी मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्याचेही वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत पुढे आल्याचे खात्रीदायक सूत्रांनी सांगितले. असे असले तरी हे अतिक्रमण हटविण्यासाठी कुठलीही ठोस पावले वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाºयांकडून उचलली जात नसल्याची चर्चा वनविभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. त्यामुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.काहींचे खरेदी-विक्रीचे व्यवहारवनविभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. तशी नोंदही वनविभागाने घेतली आहे. परंतु, प्रभावी कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, याच वनविभागाच्या परिसरातील काही भूखंड काहींनी थेट विक्रीही केल्याचे वनविभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचे नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर वनविभागाच्या कर्मचाºयाने सांगितले.अतिक्रमण फोफावले; ग्रा.पं. चुप्पी साधूनमौजा कारला भागातील वनविभागाच्या जागेवर नागरिकांकडून केल्या जात असलेल्या अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत असताना ग्रा.पं. प्रशासनानेही चूप राहण्याचेच पसंत केले. त्यामुळे या अतिक्रमणाला कुठल्या राजकीय नेत्यासह एखाद्या मोठ्या भूखंड माफियाचे पाठबळ तर नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण