शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
2
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
4
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
5
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
6
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
7
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
8
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
9
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
11
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
12
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
13
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
14
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
19
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
20
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...

चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

By admin | Updated: January 17, 2017 01:06 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात.

अतिक्रमणाचा मारा : बेघर, गरीबांना निवाऱ्यासाठीही मिळेना जागावर्धा : पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात. शहरभर हिंडून एखाद्या वस्तूची विक्री केल्यावरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. रस्त्याच्या कडेला हातगाड्या आणि अशा राहुट्यांचे वाढलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी होते. यात त्रेधातिरपीट उडते ती याच गोरगरीबांची. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार होत आहे. आजच्या अतिक्रमणा हटविण्याच्या माऱ्यातही दोन चिमुरड्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या डोईवर असलेले छप्पर हरविले. काही कळत नसले तरी त्या चिमुकल्यांचे निरागस डोळे व बालमन आपल्या आई-वडिलांच्या कृतीचा वेध घेत होते. काहीतरी गमावल्याचा भाव त्यांच्या डोळ्यात साचलेला पाहायला मिळाला. घर गेल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शहरांकडे बेरोजगारांचे लोंढे वाढत आहे. या शहरीकरणामुळे अतिक्रमणामध्ये वेगाने वाढ होत आहे. शहरांतील रस्ते अतिक्रमणामुळे निमूळते होत आहे तर खुली मैदाने, वस्त्यांमधील रिकाम्या जागांवर झोपड्या व अवैध दुकाने उभी राहत आहेत. या सर्व प्रकारांमुळे गजबज वाढत आहे. पैसा खर्च करून शहरात वास्तव्य करणाऱ्या शिक्षित, सुजाण नागरिकांना मात्र ही बाब रूजत नाही. व्यवसाय करीत असेल तर त्यांनी अधिकृत जागेची खरेदी करून तो करावा, अशी भूमिका घेतली जाते. यातूनच कधी नागरिकांच्या रेट्याने तर कधी प्रशासनाच्या पुढाकाराने शहरांतील अतिक्रमण हटविले जाते; पण यात कुठेही धनदांडग्यांचा बळी जात नसल्याचे वास्तव आहे. गत दोन दिवसांपासून वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. यात अवैधरित्या भर रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने हटविली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगिचाजवळही शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात काही दुकाने, पानठेल्याचे पक्के अतिक्रमण तोडले. सोबतच त्याच रांगेत भिंतीलगत असलेली काही जुनाट साहित्यापासून बनलेल्या झोपड्याही धराशाई झाल्या. या झोपड्यांवर गजराज चालला नाही; पण कर्मचाऱ्यांच्या तंबीमुळे सदर नागरिकांनीच आपल्या झोपड्या एकेक बासा, टीन काढत गोळा केल्या. यात घरातील भांडे व अन्य साहित्य उघड्यावर आले होते. हे सर्व दृश्य दोन निरागस चिमुरडे पाहत होते. त्यांना काहीही कळत नसले तरी त्यांच्या डोळ्यादेखत ते बेघर होत होते. मन हेवालणारा हा प्रकार प्रत्येक अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये घडतो; पण या बेघरांच्या भावना जाणून घेण्यात कुणालाही रस नसतो. पण रात्रीचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच! यांचा विचार कुणी करावा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या नागरिकांप्रती कुणाचे काही कर्तव्य नाही काय, असा प्रश्नही आपसूकच उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.(कार्यालय प्रतिनिधी)