शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

By admin | Updated: January 17, 2017 01:06 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात.

अतिक्रमणाचा मारा : बेघर, गरीबांना निवाऱ्यासाठीही मिळेना जागावर्धा : पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात. शहरभर हिंडून एखाद्या वस्तूची विक्री केल्यावरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. रस्त्याच्या कडेला हातगाड्या आणि अशा राहुट्यांचे वाढलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी होते. यात त्रेधातिरपीट उडते ती याच गोरगरीबांची. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार होत आहे. आजच्या अतिक्रमणा हटविण्याच्या माऱ्यातही दोन चिमुरड्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या डोईवर असलेले छप्पर हरविले. काही कळत नसले तरी त्या चिमुकल्यांचे निरागस डोळे व बालमन आपल्या आई-वडिलांच्या कृतीचा वेध घेत होते. काहीतरी गमावल्याचा भाव त्यांच्या डोळ्यात साचलेला पाहायला मिळाला. घर गेल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शहरांकडे बेरोजगारांचे लोंढे वाढत आहे. या शहरीकरणामुळे अतिक्रमणामध्ये वेगाने वाढ होत आहे. शहरांतील रस्ते अतिक्रमणामुळे निमूळते होत आहे तर खुली मैदाने, वस्त्यांमधील रिकाम्या जागांवर झोपड्या व अवैध दुकाने उभी राहत आहेत. या सर्व प्रकारांमुळे गजबज वाढत आहे. पैसा खर्च करून शहरात वास्तव्य करणाऱ्या शिक्षित, सुजाण नागरिकांना मात्र ही बाब रूजत नाही. व्यवसाय करीत असेल तर त्यांनी अधिकृत जागेची खरेदी करून तो करावा, अशी भूमिका घेतली जाते. यातूनच कधी नागरिकांच्या रेट्याने तर कधी प्रशासनाच्या पुढाकाराने शहरांतील अतिक्रमण हटविले जाते; पण यात कुठेही धनदांडग्यांचा बळी जात नसल्याचे वास्तव आहे. गत दोन दिवसांपासून वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. यात अवैधरित्या भर रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने हटविली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगिचाजवळही शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात काही दुकाने, पानठेल्याचे पक्के अतिक्रमण तोडले. सोबतच त्याच रांगेत भिंतीलगत असलेली काही जुनाट साहित्यापासून बनलेल्या झोपड्याही धराशाई झाल्या. या झोपड्यांवर गजराज चालला नाही; पण कर्मचाऱ्यांच्या तंबीमुळे सदर नागरिकांनीच आपल्या झोपड्या एकेक बासा, टीन काढत गोळा केल्या. यात घरातील भांडे व अन्य साहित्य उघड्यावर आले होते. हे सर्व दृश्य दोन निरागस चिमुरडे पाहत होते. त्यांना काहीही कळत नसले तरी त्यांच्या डोळ्यादेखत ते बेघर होत होते. मन हेवालणारा हा प्रकार प्रत्येक अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये घडतो; पण या बेघरांच्या भावना जाणून घेण्यात कुणालाही रस नसतो. पण रात्रीचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच! यांचा विचार कुणी करावा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या नागरिकांप्रती कुणाचे काही कर्तव्य नाही काय, असा प्रश्नही आपसूकच उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.(कार्यालय प्रतिनिधी)