शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

चिमुकल्यांच्या डोळ्यादेखत उजाडले छप्पर

By admin | Updated: January 17, 2017 01:06 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात.

अतिक्रमणाचा मारा : बेघर, गरीबांना निवाऱ्यासाठीही मिळेना जागावर्धा : पोटाची खळगी भरण्यासाठी कुणी रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावतात. कुणी एखाद्या भिंतीलगतची रिकामी जागा पाहुन छोटीसी राहुटी करतात. शहरभर हिंडून एखाद्या वस्तूची विक्री केल्यावरच त्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. रस्त्याच्या कडेला हातगाड्या आणि अशा राहुट्यांचे वाढलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी होते. यात त्रेधातिरपीट उडते ती याच गोरगरीबांची. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार होत आहे. आजच्या अतिक्रमणा हटविण्याच्या माऱ्यातही दोन चिमुरड्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या डोईवर असलेले छप्पर हरविले. काही कळत नसले तरी त्या चिमुकल्यांचे निरागस डोळे व बालमन आपल्या आई-वडिलांच्या कृतीचा वेध घेत होते. काहीतरी गमावल्याचा भाव त्यांच्या डोळ्यात साचलेला पाहायला मिळाला. घर गेल्याने ऐन थंडीच्या कडाक्यात त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. सध्या शहरीकरणाने वेग घेतला आहे. शहरांकडे बेरोजगारांचे लोंढे वाढत आहे. या शहरीकरणामुळे अतिक्रमणामध्ये वेगाने वाढ होत आहे. शहरांतील रस्ते अतिक्रमणामुळे निमूळते होत आहे तर खुली मैदाने, वस्त्यांमधील रिकाम्या जागांवर झोपड्या व अवैध दुकाने उभी राहत आहेत. या सर्व प्रकारांमुळे गजबज वाढत आहे. पैसा खर्च करून शहरात वास्तव्य करणाऱ्या शिक्षित, सुजाण नागरिकांना मात्र ही बाब रूजत नाही. व्यवसाय करीत असेल तर त्यांनी अधिकृत जागेची खरेदी करून तो करावा, अशी भूमिका घेतली जाते. यातूनच कधी नागरिकांच्या रेट्याने तर कधी प्रशासनाच्या पुढाकाराने शहरांतील अतिक्रमण हटविले जाते; पण यात कुठेही धनदांडग्यांचा बळी जात नसल्याचे वास्तव आहे. गत दोन दिवसांपासून वर्धा शहरातील अतिक्रमण हटविण्यात येत आहे. यात अवैधरित्या भर रस्त्यात अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांची दुकाने हटविली जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर बगिचाजवळही शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात काही दुकाने, पानठेल्याचे पक्के अतिक्रमण तोडले. सोबतच त्याच रांगेत भिंतीलगत असलेली काही जुनाट साहित्यापासून बनलेल्या झोपड्याही धराशाई झाल्या. या झोपड्यांवर गजराज चालला नाही; पण कर्मचाऱ्यांच्या तंबीमुळे सदर नागरिकांनीच आपल्या झोपड्या एकेक बासा, टीन काढत गोळा केल्या. यात घरातील भांडे व अन्य साहित्य उघड्यावर आले होते. हे सर्व दृश्य दोन निरागस चिमुरडे पाहत होते. त्यांना काहीही कळत नसले तरी त्यांच्या डोळ्यादेखत ते बेघर होत होते. मन हेवालणारा हा प्रकार प्रत्येक अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये घडतो; पण या बेघरांच्या भावना जाणून घेण्यात कुणालाही रस नसतो. पण रात्रीचे काय, हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच! यांचा विचार कुणी करावा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या नागरिकांप्रती कुणाचे काही कर्तव्य नाही काय, असा प्रश्नही आपसूकच उपस्थित झाल्यावाचून राहत नाही.(कार्यालय प्रतिनिधी)