शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

शीतलहरींनी जिल्ह्यात गारठा

By admin | Updated: January 15, 2017 00:44 IST

आॅक्टोबर ते जानेवारी हा कालावधी साधारणत: हिवाळ्याचा मानला जातो. यातील डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडून

पारा ८ अंशांखाली जाण्याचा अंदाज : कमाल तापमानातही होतेय घट श्रेया केने वर्धा आॅक्टोबर ते जानेवारी हा कालावधी साधारणत: हिवाळ्याचा मानला जातो. यातील डिसेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडून जानेवारी मध्यापर्यंत हुडहुडी कमी होते; पण यंदा उत्तरेकडे वाहणाऱ्या शीतलहरी आणि बर्फवृष्टीमुळे जिल्हा गारठणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या जिल्ह्यात पारा ९ अंशांपर्यंत घसरला आहे. आणखी चार-पाच दिवस हुडहुडी भरणारी थंडी पडणार असून पारा ७-८ अंशांपर्यंत घसरेल, असा अंदाजही वर्तविला जात आहे. जानेवारी महिन्यातील मकरसंक्रांतीनंतर थंडीचा जोर कमी होतो. नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने कडाक्याच्या थंडीचे मानले जातात; पण यंदा या दोन्ही महिन्यात विशेष थंडी जाणवली नाही. डिसेंबर महिन्यात काही प्रमाणात पारा घसरला होता. साधरण १२ ते १० अंशांपर्यंत पारा घसरला होती. काही दिवस ९.५ अंशांवर पारा घसरला होता. यानंतर ढगाळ वातावरणामुळे पुन्हा थंडीचा जोर कमी झाला. जानेवारी महिन्याच्या प्रारंभी विशेष थंडी नसल्याने हिवाळा संपला तर नाही ना, अशी भीतीही व्यक्त होत होती; पण ही भीती व्यर्थ ठरली. जानेवारी महिन्याच्या दहा दिवसांनंतर थंडीचा जोर आणखी वाढला. १०-११ अंशांपर्यंत गेलेला पारा पुन्हा कमी झाला. काल-परवापर्यंत ९ अंशांपर्यंत पारा खाली आला आहे. शिवाय कमाल तापमानातही घट होत असल्याने दिवसभर हुडहुडी भरविणारी थंडी जाणवत आहे. सर्व ऋतूमध्ये वर्धा जिल्ह्यातील साधारण तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत असते; पण यंदा कमाल तापमानही मोठ्या प्रमाणात घसरले. पारा २५ अंशांपर्यंत घसरल्याने दिवसभर थंडी जाणवत असल्याचे दिसते. कमाल आणि किमान दोन्ही तापमानामध्ये घसरण होत असल्याने जिल्हा गारठत असल्याचेच चित्र आहे. या हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा नागरिक, पर्यटक आनंद लुटत असून पिकांनाही काही प्रमाणात फायदा होत असल्याचे दिसते. रबी हंगामातील गहू, चणा पिकांना या गुलाबी थंडीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पिके जोमात असून उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. असे असले तरी तूर पिकाला १० अंशांच्या खाली गेलेल्या पाऱ्यामुळे नुकसान होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. कमाल तापमानातही घट ऋतू कोणताही असला तरी वर्धा जिल्ह्यातील तापमान ३० ते ३५ अंशांपर्यंत नोंदले गेले आहे; पण यंदा कमाल तापमानातही कमालीची घट होत आहे. शुक्रवारी कमाल तापमान २५ अंशांपर्यंत खाली आले होते. या तापमानातही आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पारा आणखी घसरणार उत्तरेकडे सध्या शीतलहर सुरू आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीचा परिणामही जिल्ह्यावर होत असल्याचे सांगण्यात येते. सध्या ९ अंशांपर्यंत घसरलेला पारा ७ ते ८ अंशांपर्यंत घसरण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे थंडीचा कालावधीही आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वातावरणातील आर्द्रता घटत असल्याने जानेवारी महिन्यातही थंडीचा जोर वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. ही थंडी आणखी चार ते पाच दिवस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हुडहुडी भरविणारी ही थंडी नागरिकांना सुखावणारी ठरणार आहे.