शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचा आदेश पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 22:20 IST

परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी, फ्लेक्स, बॅनर न लावण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करून आदेश निर्गमित केले. असे असताना शहरात व बाहेर फ्लेक्स, बॅनर लावून मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांचा आदेश पक्षातीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायदळी तुडविल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपदाधिकाऱ्यांचे कृत्य : अवैधरीत्या लावले फ्लेक्स,बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी, फ्लेक्स, बॅनर न लावण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करून आदेश निर्गमित केले. असे असताना शहरात व बाहेर फ्लेक्स, बॅनर लावून मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांचा आदेश पक्षातीलच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पायदळी तुडविल्याचे चित्र आहे. वरिष्ठांचे आदेश पायदळी तुडविण्यासाठीच असतात, हेच भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कृतीतून दाखविले आहे.नेते मंडळी, पदाधिकाऱ्यांकडून ठिकठिकाणी अनधिकृतपणे पोस्टर, बॅनर, फ्लेक्स लावून शहराचे सातत्याने विद्रुपीकरण केले जाते. याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने आदेश निर्गमित करून अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावण्यावर बंदी घातली होती. या निर्णयाचे पालन करण्याच्या अनुषंगाने भाजपने अंमलबजावणी केली. तशी जाहिरातही पधरवड्यापूर्वी प्रसिद्ध केली. या जाहिरातीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी सक्षम अधिकाºयाच्या पूर्वपरवानगीशिवाय भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना फ्लेक्स, बॅनर न लावण्याबाबत आवाहन केले. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात हा आदेश पायदळी तुडविल्याचेच दिसून येते. धुनिवाले चौक परिसरात याशिवाय अन्य भागात अवैधरीत्या आदेश झुगारून फलक लावण्यात आले आहेत. यामुळे शहर विद्रुप झाले आहे.आचारसंहिता असूनही फलक कायमसमुद्रपूर येथे दहेगाव चौक ते पोलीस ठाण्यापर्यंत मोक्याच्या ठिकाणी जागोजागी फलक दिसून येत आहेत. २० फेब्रुवारीपासून शासकीय परिपत्रकानुसार आदर्श आचारसंहिता सुरू झाल्याचे पत्रक सर्व शासकीय कार्यालयांंना प्राप्त झाले आहे. समुद्रपूर नगरपंचायत मात्र यापासून अनभिज्ञ आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे एक फलक निघाला की, त्याच दिवशी राजकीय नेत्याचा दुसरा फलक लावण्याची परंपरा नगरपंचायत स्थापन झाल्यापासून कायम आहे. या फलकामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत शहर फलकमुक्त करण्याचा आदेश दिला असतानाही नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचीही अवहेलना होत आहे. या प्रकरणात वरिष्ठांकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Banerबाणेर