शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

गरजा बदलवून नवी संस्कृती निर्माण करावी

By admin | Updated: February 18, 2017 01:32 IST

नोटबंदीचा परिणाम हा विषय चलचित्रपटासारखा आणि अतिशय गुंतागुंतीचा आहे.

श्रीनिवास खांदेवाले : ‘नोटाबंदीचे परिणाम’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र वर्धा : नोटबंदीचा परिणाम हा विषय चलचित्रपटासारखा आणि अतिशय गुंतागुंतीचा आहे. आज नोटबंदी होऊन तीन महिने झाले. पंतप्रधानांनी तर ५० दिवसाची मुदत मागितली होती. परंतु आजही परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. संशोधकांनी यावर चिंतन केले पाहिजे, असे आवाहन अर्थतज्ज्ञ व विदर्भवादी नेते डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी केले. अर्थशास्त्र व वाणिज्य शाखेच्यावतीने स्थानिक लोक महाविद्यालय येथे ‘नोटाबंदीचे परिणाम’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी बीजभाषक म्हणून खांदेवाले बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी केले. अध्यक्षस्थानी लोक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. गजानन कोटेवार होते. मंचावर ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. किशोर सानप, संस्था सचिव प्रकाश भोयर, माजी प्राचार्य अमृत येऊलकर, माजी प्राचार्य माधव ठाकरे, शिवकुमार रोडे, प्रा.डॉ. राजीव जाधव होते. अतिथी परिचय प्रा. सुनील पाटणे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे यांनी केले. सदर चर्चासत्र तीन सत्रात घेण्यात आले. पुढे बोलताना डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले, विमुद्रीकरणाचा समाजावर फार प्रतिकुल परिणाम झाला. ही बाब केंद्रीय अर्थमंत्री यांनी सुद्धा मान्य केली आहे. ज्यासाठी नोटबंदीचा निर्णय घेतला, जसे काळा पैसा बाहेर काढणे, बनावट नोटा बंद करणे हे उद्देश खरोखर सफल झाले का, कारण काळा पैसा मिळविणारे आणि नकली नोटा तयार करणारे यात शक्कल लढवितात. यासाठी संस्कृती व लोकांची मानसिकता बदलविणे फार महत्वाचे आहे. नोटाबंदीचा रोजगारावर परिणाम झाला. उत्पादन ठप्प झाले. उत्पादन प्रक्रिया गुंतागुंतीची आहे. त्याप्रमाणे नोटबंदी सुद्धा गुंतागुतीची आहे. गरजेनुसार परिस्थिती बदलविली पाहिजे. परंतु त्याचा पूर्व अभ्यास असावा. गरीब आणि सामान्य माणसाच जगणं कठीण होऊ नये एवढेच सरकारने लक्षात घ्यावे. लोकांनीही आपल्या गरजा बदलवून नवीन संस्कृती निर्माण करावी, असे खांदेवाले यांनी सांगितले. यानंतर प्रा.डॉ. राजीव जाधव, प्रा. अतुल फिरके, डॉ. विवेक चव्हाण यांनी लिहिलेल्या ‘सांख्यिकी आणि व्यावसायिक गणित’ या पुस्तकाचे विमोचन कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते करण्यात आले. चर्चासत्रात दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात डॉ. अंजली कुळकर्णी व डॉ. तुषार चौधरी यांनी नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रावर होणाऱ्या परिणामांवर चर्चा केली. डॉ. राजकुमार शर्मा, डॉ. रंजना लांजेवार, डॉ. वर्षा गंगणे तसेच अर्थशास्त्र व वाणिज्य अभ्यासक्रमातील प्राध्यापकांनी यावेळी शोधनिबंध सादर केले. या सत्राच्या अध्यक्ष डॉ. स्रेहा देशपांडे होत्या. यावेळी मान्यवरांनी विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. समारोपीय कार्यक्रम डॉ. गजानन कोटेवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. प्राचार्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंचावर प्राचार्य डॉ. पुष्पा तायडे, संयोजक प्रा. डॉ. राजीव जाधव होते. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विश्वनाथ बेताल यांनी तर आभार प्रा. डॉ. सुचित्रा पाटणे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. साहुरकर, प्रा.डॉ. सुरकार, प्रा. वाळके, प्रा.डॉ. भिमनवार, प्रा. मानकर, प्रा. सोनुरकर, प्रा. पिंपळे, प्रा. गणराज, प्रा. बहादुरे व कर्मचारी यांनी सहकार्य केले. चर्चासत्राकरिता विदर्भातील विविध महाविद्याल्याचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)