शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
3
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
4
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
5
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
6
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
7
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
8
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
9
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
10
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
11
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
12
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
13
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
14
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
15
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
16
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
17
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
18
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
19
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
20
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम

सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली.

ठळक मुद्देजागेअभावी केंद्र बंद करण्याची वेळ : जादा भावामुळे शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेने जिल्ह्यातील आठ कापूस खरेदी केंद्रांवर ५ लाख ९ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. येथे कापसाला खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव दिला जात असल्याने या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होऊन केंद्र जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली. राज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात असल्याने शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे.कासवगती खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांची माथीरोहणा : येथील ग्लोबल कोटस्पीनमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु, शेतमाल खरेदीही ही प्रक्रिया अतिशय कासवगतीने होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर कापूस भरलेली वाहने दोन-दोन दिवस उभी ठेवावी लागतात. त्या वाहनांचे भाडे मात्र शेतकऱ्यांना अदा करावे लागत आहे. सीसीआयच्या या कापूस खरेदी केंद्रावर परिसरातील शेतकरी मालवाहूने तसेच बैलबंडीने कापूस विक्री करीता आणतात. मात्र, कापूस खरेदी कासवगतीने होत असल्याने बैलांसाठी वैरणही शेतकऱ्यांना सोबत घेऊन यावे लागत आहे. जागेसह इतर कारणे पुढे करून कापूस खरेदीच्या गतीलाच बे्रक लावल्या जात आहे. दिवसभऱ्यात केवळ २० मालवाहू आणि दहा बैलगाडीमधील कापसाची खरेदी केली जात आहे. एकूणच ५०० क्विंटलच्यावर कापूस खरेदी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुंर्दंड सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर रात्र काढावी लागत आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविण्यात येत असल्याने अनेक शेतकरी नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना कापूस देताना दिसतात. या सर्व प्रकाराचा फायदा घेत व्यापारीही कपाशी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे बघावयास मिळते.कापूस भरलेली बैलगाडी २४ फेबु्रवारीला सकाळी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर नेण्यात आली. त्याच दिवशी हा कापूस खरेदी होणे क्रमप्राप्त होते. पण विविध कारणे पुढे करून २५ फेब्रुवारीला दुपारी कापूस खरेदी करण्यात आला.- मंगेश सुपनार, शेतकरी, रोहणा.कापूस साठविण्यासाठी जिनिंगमध्ये जागा नाही. शिवाय जागा सध्या कमी पडत असून मजुरांचा अभाव आहे. त्यामुळे खरेदीची गती मंदावली आहे. खरेदी बंद होणार ही अफवा आहे.- नंदकिशोर सोकोये, केंद्र प्रमुख, सीसीआय.

टॅग्स :cottonकापूस