शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने केली ५.९ लाख क्विंटल पांढऱ्या सोन्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली.

ठळक मुद्देजागेअभावी केंद्र बंद करण्याची वेळ : जादा भावामुळे शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या अखत्यारितील संस्थेने जिल्ह्यातील आठ कापूस खरेदी केंद्रांवर ५ लाख ९ हजार ८०० क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. येथे कापसाला खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव दिला जात असल्याने या केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाची आवक होऊन केंद्र जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.हिंगणघाट येथे १ लाख २५ हजार क्विंटल, देवळी १ लाख ५२ हजार ३०० क्विंटल, वायगाव येथे ५० हजार क्विंटल, खरांगणा येथे ५ हजार क्विंटल, रोहणा येथे ४० हजार क्विंटल, सेलू येथे ४५ हजार क्विंटल तर सिंदी (रेल्वे) येथे ३० हजार व समुद्रपूर येथे ६२ हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी सीसीआयने केली आहे. या कापसापासून १ लाख एक हजार ५०० कापूस गाठींची निर्मिती जिल्ह्यात करण्यात आली. राज्य सरकारचा पणन महासंघ व खासगी व्यापारी यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या भावापेक्षा दोनशे रुपयांनी सीसीआयचा भाव अधिक आहे. सध्या ५ हजार ४५० रुपये भाव सीसीआयकडून दिला जात असल्याने शेतकरी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस आणत आहे.कासवगती खरेदीचा भुर्दंड शेतकऱ्यांची माथीरोहणा : येथील ग्लोबल कोटस्पीनमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदी सुरू करण्यात आली आहे. परंतु, शेतमाल खरेदीही ही प्रक्रिया अतिशय कासवगतीने होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतकेच नव्हे तर कापूस भरलेली वाहने दोन-दोन दिवस उभी ठेवावी लागतात. त्या वाहनांचे भाडे मात्र शेतकऱ्यांना अदा करावे लागत आहे. सीसीआयच्या या कापूस खरेदी केंद्रावर परिसरातील शेतकरी मालवाहूने तसेच बैलबंडीने कापूस विक्री करीता आणतात. मात्र, कापूस खरेदी कासवगतीने होत असल्याने बैलांसाठी वैरणही शेतकऱ्यांना सोबत घेऊन यावे लागत आहे. जागेसह इतर कारणे पुढे करून कापूस खरेदीच्या गतीलाच बे्रक लावल्या जात आहे. दिवसभऱ्यात केवळ २० मालवाहू आणि दहा बैलगाडीमधील कापसाची खरेदी केली जात आहे. एकूणच ५०० क्विंटलच्यावर कापूस खरेदी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे. परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भुंर्दंड सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर सीसीआयच्या खरेदी केंद्रावर रात्र काढावी लागत आहे. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविण्यात येत असल्याने अनेक शेतकरी नाईलाजास्तव खासगी व्यापाऱ्यांना कापूस देताना दिसतात. या सर्व प्रकाराचा फायदा घेत व्यापारीही कपाशी उत्पादकांची आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे बघावयास मिळते.कापूस भरलेली बैलगाडी २४ फेबु्रवारीला सकाळी सीसीआयच्या खरेदी केंद्रावर नेण्यात आली. त्याच दिवशी हा कापूस खरेदी होणे क्रमप्राप्त होते. पण विविध कारणे पुढे करून २५ फेब्रुवारीला दुपारी कापूस खरेदी करण्यात आला.- मंगेश सुपनार, शेतकरी, रोहणा.कापूस साठविण्यासाठी जिनिंगमध्ये जागा नाही. शिवाय जागा सध्या कमी पडत असून मजुरांचा अभाव आहे. त्यामुळे खरेदीची गती मंदावली आहे. खरेदी बंद होणार ही अफवा आहे.- नंदकिशोर सोकोये, केंद्र प्रमुख, सीसीआय.

टॅग्स :cottonकापूस