शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र; एसडीओंकडून चालढकल

By admin | Updated: November 13, 2015 02:06 IST

केंद्र तथा राज्य शासनाच्या नियमानुसार जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र ग्रामदूत केंद्रातून आल्यानंतर त्वरित देणे अनिवार्य आहे;...

नागरिकांना मन:स्ताप : तीन महिन्यांपासून २६०० प्रकरणे धूळ खातआष्टी (श.) : केंद्र तथा राज्य शासनाच्या नियमानुसार जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्र ग्रामदूत केंद्रातून आल्यानंतर त्वरित देणे अनिवार्य आहे; पण उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या ताठर प्रशासनामुळे तीन महिन्यांपासून २ हजार ६०० प्रकरणे आक्षेप लावून थंडबस्त्यात आहेत. नागरिकांना ‘तारीख पे तारीख’ करीत रित्या हाताने परतावे लागत आहे. यामुळे त्रस्त नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करून एसडीओवर कारवाईची मागणी केली आहे. जात प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक असणारा जन्माचा दाखला ज्या तालुक्याचा आहे, त्याच तालुक्यातून प्रकरण सादर करावे लागते. आर्वी, आष्टी (शहीद), कारंजा (घाडगे) तालुक्यातील नागरिक नोकरी व रोजगारासाठी नागपूर, अमरावती, यवतमाळसह विविध ठिकाणी वास्तव्यास आहेत. शैक्षणिक कामांसाठी व नोकरीकरिता जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलीयर प्रमाणपत्रासाठी ग्रामदूत सेवा केंद्रातून प्रकरणे तयार केलीत. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्याशिवाय प्रकरण तयार होणार नाही, असा शासननिर्णय आहे. त्याप्रमाणे ग्रामदूत सेवा केंद्र कागदपत्र तपासणी करून प्रकरण दाखल करून घेतात. संबंधितांना पोच पावती देऊन त्यावर प्रकरण दाखल केल्याची तारीख व प्रमाणपत्र देण्याची तारीखही असते. यात १८ दिवसाचे अंतर आहे. यानंतर तहसील कार्यालयात लिपीक, नायब तहसीलदार, तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यावर दोन दिवसांनी प्रकरणे उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोतात.या कार्यालयात तपासणी करून एसडीओच्या टेबलवर प्रकरण पोहोचते. कामाचा ताण आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका, तालुक्याचे दौरे यात व्यस्त असलेल्या उपविभागीय महसूल अधिकारी शुभांगी आंधळे चार-पाच दिवसांनी ही प्रकरणे पाहतात. यात कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी प्रकरणांवर आक्षेप लावून परत तहसील कार्यालयात पाठवितात. कालावधी संपल्यानंतर नागरिक प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात, तेव्हा त्यांना आक्षेप लावले असून आधी त्याची पूर्तता करा, असा सल्ला देऊन परत पाठविले जाते. परत सर्व कागदपत्रांमध्ये दिवस निघून जातो. शैक्षणिक नुकसान सहन करण्यापलीकडे पर्याय राहिला नाही. नागरिकांनी सर्व कागदपत्रे दिल्यावरही उपविभागीय अधिकारी प्रत्यक्ष सुनावणीसाठी बोलवा, असा आक्षेप लिहितात. नागरिक येतात तेव्हा एसडीओ कार्यालयात नसतात. कधी मिटिंग तर कधी दौऱ्यावर असतात. यामुळे पैशाचा चुराडा झाल्याच्या भावना नागरिक संतापून व्यक्त करीत आहेत. एका प्रमाणपत्रासाठी दीडशे रुपये ये-जा करण्यात आणि मजुरी तथा नोकरी असणारे कर्मचारी सुट्या काढून आर्वीला येत असल्याने त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागतात. एसडीओंनी जिल्ह्यातील नागरिकांच्या भावना दुखवू नये अन्यथा जनआंदोलन उभारावे लागेल, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनु भार्गव यांनी दिला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनासह प्रलंबित २६०० प्रकरणांच्या छायांकीत प्रतीही पाठविण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)