शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
4
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
5
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
6
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
7
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
8
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
9
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
10
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
11
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
12
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
13
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
14
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
15
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
16
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
17
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
18
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
19
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
20
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

कार प्रकल्पग्रस्तांची जिल्हाकचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:38 IST

कारंजा तालुक्यातील कारप्रकल्पासाठी सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली.

दालनासमोर ठिय्या : सकारात्मक चर्चेअंती आंदोलन मागे लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कारंजा तालुक्यातील कारप्रकल्पासाठी सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहीत केली. याला १८ वर्षांचा कालावधी लोटूनही मोबदला देण्यात आला नाही. मंगळवारी मरणशय्येवर असलेल्या वृद्धाला घेवून प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मोबदल्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेअंती आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे बाळा जगताप यांनी केले. कार प्रकल्पाच्या कालव्याकरिता सुसुंद्रा व माणिकवाडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या; मात्र, गुलाब लाहेबर, गणपत उईके, मैनाबाई उईके व रामा आत्राम यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. वेळोवेळी संबंधीतांना निवेदने देऊनही काहीच उपयोग झाला नाही. या शेतकऱ्यांची कागदोपत्री अधिग्रहीत जमिनीची नोंद नव्हती. या नोंदीकरिता प्रहार संघटनेच्यावतीने दफन आंदोलन केल्यानंतर त्यांची नोंद घेण्यात आली. माणिकवाडा व सुसंद्रा येथील शेतकऱ्यांना मोबदल्याची अल्पशी रक्कम मिळाली. रक्कम देताना अनेक प्रकरणात नको तेवढ्या चूका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केल्या. यात शेतकऱ्यांना नाहक त्रासाचा सामना करावा आगल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जमिनी गेलेल्या चार वयोवृद्ध प्रकल्पग्रस्तांना मोबदला न मिळाल्याने त्यांना वैद्यकीय उपचार घेणेही कठीण झाले आहे. पोटासाठी या वयातही त्यांना झटावे लागत आहे. यामुळे त्यांचा थकीत मोबदला तात्काळ द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती. मोबदल्याच्या मागणीसाठी आलेल्या वयोवृद्धांची दैना पाहून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वत: दालनाबाहेर येत आंदोलकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी निम्मी रक्कमही दिली. शासनाच्या यादीत सदर प्रकल्पग्रस्तांचे नाव आहे की नाही याची चौकशी करून तात्काळ योग्य कार्यवाही करण्याचे आदेशही सहायक पुर्नवसन अधिकारी दांडेकर यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.