शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा

By admin | Updated: February 26, 2015 01:19 IST

शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या जमिनी संपादित करण्याचा अधिकार सरकारला देणारा भूमी अधिग्रहण वटहुकूम संसदेने कायद्यात रूपांतरित करू नये, ..

वर्धा : शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या जमिनी संपादित करण्याचा अधिकार सरकारला देणारा भूमी अधिग्रहण वटहुकूम संसदेने कायद्यात रूपांतरित करू नये, या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ यावेळी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले़ शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी वा खासगी उद्योगपतींना विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहित करताना ७० टक्के शेतकऱ्यांची परवानगी, बाजारभावापेक्षा चौपट किंमत, विस्थापित शेतकऱ्याच्या एका मुलाला नोकरी व १५ टक्के विकसीत जमिनीचा वाटा, अशा तरतुदी भूमी अधिग्रहण कायदा २०१३ मध्ये होत्या़ तो सर्वपक्षीय खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत एकमताने मंजूर केला होता. मोदी सरकारने शेतकरी हिताचा हा कायदाच बदलला़ शेतकऱ्यांच्या ७० टक्के लेखी संपत्तीची अटच काढून टाकली़ हे विधेयक लोकसभेत न मांडता ३१ डिसेंबर रोजी वटहुकूम काढला. हा वटहुकूम कायदा म्हणून लोकसभेत मंजूर झाला तर शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती समता परिषदेने व्यक्त केली़ यामुळे हा वटहुकूम मोडीत काढावा, अशी मागणी समता परिषदेने केली़धरणे आंदोलनात विभागीय संघटक प्रा. दीवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, सुरेश सातोकर, किशोर तितरे, चंदू भोयर, संजय भगत व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी)