शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

प्रस्तावित भूमी अधिग्रहण कायदा रद्द करा

By admin | Updated: February 26, 2015 01:19 IST

शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या जमिनी संपादित करण्याचा अधिकार सरकारला देणारा भूमी अधिग्रहण वटहुकूम संसदेने कायद्यात रूपांतरित करू नये, ..

वर्धा : शेतकऱ्यांची संमती न घेता त्यांच्या जमिनी संपादित करण्याचा अधिकार सरकारला देणारा भूमी अधिग्रहण वटहुकूम संसदेने कायद्यात रूपांतरित करू नये, या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले़ यावेळी जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले़ शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारी वा खासगी उद्योगपतींना विविध प्रकल्पांसाठी अधिग्रहित करताना ७० टक्के शेतकऱ्यांची परवानगी, बाजारभावापेक्षा चौपट किंमत, विस्थापित शेतकऱ्याच्या एका मुलाला नोकरी व १५ टक्के विकसीत जमिनीचा वाटा, अशा तरतुदी भूमी अधिग्रहण कायदा २०१३ मध्ये होत्या़ तो सर्वपक्षीय खासदारांनी लोकसभा व राज्यसभेत एकमताने मंजूर केला होता. मोदी सरकारने शेतकरी हिताचा हा कायदाच बदलला़ शेतकऱ्यांच्या ७० टक्के लेखी संपत्तीची अटच काढून टाकली़ हे विधेयक लोकसभेत न मांडता ३१ डिसेंबर रोजी वटहुकूम काढला. हा वटहुकूम कायदा म्हणून लोकसभेत मंजूर झाला तर शेतकरी देशोधडीला लागेल, अशी भीती समता परिषदेने व्यक्त केली़ यामुळे हा वटहुकूम मोडीत काढावा, अशी मागणी समता परिषदेने केली़धरणे आंदोलनात विभागीय संघटक प्रा. दीवाकर गमे, जिल्हा संघटक विनय डहाके, विजय मुळे, सुरेश सातोकर, किशोर तितरे, चंदू भोयर, संजय भगत व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी)