शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

पहिल्याच दिवशी १ हजार ८३६ क्विंटल सोयाबीनची खरेदी

By admin | Updated: October 8, 2015 01:46 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी धान्य खरेदीच्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

३७५० रुपये मिळाला भाव : कृउबास धान्य खरेदीचा शुभारंभ सेलू : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी धान्य खरेदीच्या नवीन हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी १ हजार ८३६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला ३७५० रुपेय प्रती क्विंटल भाव देण्यात आला.बाजार समितीचे नवनियुक्त सभापती विद्याधर वानखेडे यांच्या हस्ते उपसभापती रामकृष्ण उमाटे, संचालक व सचिव आय.आय. सुफी यांच्या उपस्थितीत काटापूजन करण्यात आले. प्रथम शेतकरी लक्ष्मण दांडेकर यांचा शाल, श्रीफळ देऊन तर अन्य शेतकऱ्यांचा उपसभापती उमाटे व मान्यवरांनी सत्कार केला.शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाचा चुकारा नियमाप्रमाणे २४ तासांत अडत्यांनी द्यावा. न मिळाल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. व्यापाऱ्यांनी अडत्यांची रक्कम विहित मुदतीत न दिल्यास त्यांची बोली बाद करण्याच्या सूचना करीत सभापती वानखेडे यांनी १५ किमीपेक्षा अधिक अंतरावरील शेतकऱ्यांनी धान्यमाल विक्रीस आणल्यास त्यांना प्रती क्विंटल ५ रुपये अतिरिक्त वाहतूक अनुदान देण्याची तरतूद आहे, असे सांगितले. शेतकरी त्याचा फायदा घेत नाही. या योजनेचा लाभ घेण्याची विनंतीही त्यांनी केली. शेतमाल तारण योजनेंतर्गत धान्य मालावर शेतकऱ्यांना वार्षिक ६ टक्के दराने ७५ टक्के रक्कम देण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी अद्यावत शेताचा सातबारा आणावा. बाजार भाव अधिक आवक झाल्यास पडतात. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीचा प्रस्ताव पाठविल्याचे सांगत वानखेडे यांनी बाजार समितीच्या सुधारीत धोरणांबाबतही विस्तृत माहिती दिली.(तालुका प्रतिनिधी)