शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

बसफेरीच्या मागणीसाठी अडवली बस

By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST

तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत;

समुद्रपूर : तीन वर्षांपासून हिंगणघाट ते कवठा बसफेरीच्या मागणीसाठी विद्यार्थी वारंवार निवेदने देत आहेत; पण राज्य परिवहन महामंडळ टाळाटाळ करीत असून वेळकाढू धोरण अवलंबित आहे़ यामुळे प्रहार संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेत बुधवारी रस्तारोको आंदोलन केले़ हिंगणघाट आगाराची बस अडवून धरताच गुरुवारपासून बसफेरी सुरू करण्यात येईल, असे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले़ यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले़स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६८ वर्षानंतरही कवठा, किन्ही या गावात बसफेरी सुरू झाली नाही़ शिक्षणासाठी येथील विद्यार्थ्यांना पाच किमीची पापपीट करीत निंभा येथे जावे लागते. नागरिकांना दुचाकी वा पायी प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो़ ही अडचण लक्षात घेत प्रहार संघटनेने १९ डिसेंबर १३ रोजी हिंगणघाट-कवठा किन्ही बसफेरी सुरू करण्याची मागणी केली़ याबाबत हिंगणघाट आगार प्रमुखांना निवेदन दिले़ यानंतर निंभा ते कवठा रस्ता नादुरूस्त असल्याचे व गावात बस पलटविण्यास अपुरी जागा असल्याने बसफेरी सुरू करता येणार नाही, असे कळविण्यात आले. गतवर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत निंभा ते कवठा किन्ही पक्क्या रस्त्याचे बांधकाम झाले. प्रहार संघटना व ग्रामस्थांनी गावातील कचरा साफ करीत बस पलटविण्यासाठी जागा केली. पुन्हा ६ जानेवारी १५ रोजी त्रुटींची पुर्तता केल्याचे पत्र विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ वर्धा येथे देण्यात आले. तेव्हा दर, टप्पा ठरविल्यावर बसफेरी सुरू होईल, असे सांगण्यात आले; पण हे आश्वासन पाळले नाही. यानंतर पुन्हा निवेदने देण्यात आली; पण कारवाई न झाल्याने अखेर बुधवारी बस अडवून धरण्यात आली़ या आंदोलनात तालुकाध्यक्ष देवा धोटे, प्रवीण जायदे, शरद काटुके, योगेश भेंडे, प्रशांत धोबे, अश्विन धाके, गोलू पन्नासे, मनोहर हिवरकर, आशिष नागपुरे, सचिन फाळेकर, आकाश राऊत तसेच गावातील महिला, पुरुष व शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.(तालुका प्रतिनिधी)