शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

वाकलेले वीज खांब तारांसह शेतात लोळले

By admin | Updated: May 20, 2016 01:51 IST

महावितरणने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. अद्यापही हजारो शेतकऱ्यांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे.

महावितरणचा गलथान कारभार : तक्रारी करूनही दुरूस्तीकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळावर्धा : महावितरणने हलगर्जीपणाचा कळस गाठला आहे. अद्यापही हजारो शेतकऱ्यांच्या विद्युत जोडण्या प्रलंबित आहे. शेतकरी चकरा मारत आहे; पण त्यांना जोडणी मिळत नाही. इतकेच नव्हे तर शेतात वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळत असल्याची तक्रार दिल्यानंतर दीड महिन्यापर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही. परिणामी, ते वीज खांब तारांसह शेतात लोळले आहे. यामुळे मशागतीची कामे खोळंबली असून महावितरणला अद्यापही जाग आली नाही. देवळी तालुक्यातील सोनेगाव (बाई) येथे दररोजच वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाचा प्रत्यय येतो. गावात विजेचा लपंडाव नित्याचा झाला आहे. महिन्यातून १५ दिवस गाव अंधारातच असते. याबाबत तक्रारी करूनही तोडगा निघाला नाही. परिणामी, काळोखातच खितपत जगावे लागत आहे. आता शेतकऱ्यांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गावातील शेतकरी विशाल खापर्डे यांच्या शेतातील वीज खांब वाकल्याने तारा लोंबकळत होत्या. या तारांमध्ये घर्षण होऊन शेतालगत काही भाग जळाला. यामुळे त्यांनी देवळी, वायगाव (नि.) व वर्धा येथे महावितरणच्या कार्यालयात तक्रारी केल्या; पण महिना लोटूनही महावितरणचे अधिकारी वा कर्मचारी शेताकडे फिरकले नाही. यामुळे शेतकऱ्यांनीच त्या तारांवरील विद्युत पुरवठा बंद केला. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांचा वीज पुरवठा बंद झाल्याने ओलिताअभावी शेतकऱ्यांची पिके वाळू लागली. इतकेच नव्हे तर रस्त्यालगत असलेले जनावरांचे पाण्याचे हौद विद्युत पुरवठ्याअभावी भरता येत नसल्याने गुरांच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्याची तसदी महावितरणने घेतली नाही. सध्या वाकलेले वीज खांब शेतातच आडवे पडले आहेत. ताराही जमिनीवर लोळत आहेत. यामुळे शेताची मशागत कशी करावी, असा प्रश्न सदर शेतकऱ्यासमोर उभा ठाकला आहे. दीड महिन्यापासून मशागतीची कामे थांबली असून आता हंगाम तोंडावर आला आहे. महावितरणने शेतात पडलेले खांब उभे करून तारा व्यवस्थित कराव्यात, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)वर्धा-वायगाव मार्गावरील वीज खांबही वाकलेवर्धा : महावितरणने प्रत्येक कामे कंत्राटदारांमार्फत करण्याचे धोरण अंगिकारले आहेत. यात संबंधित कंत्राटदारावर नियंत्रण नसल्याने कामांचा दर्जा राखला जात नसल्याचे समोर येत आहे. थोड्याही वादळामध्ये विद्युत खांब वाकत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. वर्धा ते वायगाव मार्गावर बुधवारी विजेचा खांब रस्त्यावर वाकला. परिणामी, तारा लोंबकळल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती.विद्युत खांब उभारण्याचे काम महावितरण कंत्राटदारांकडून करून घेते. यात कंत्राटदार योग्यरित्या काम न करता मलिदा लाटत असल्याचेच समोर येत आहे. याच प्रकारामुळे वरवर गाडलेले खांब वाकत असून प्रसंगी जमिनीवर लोळत असल्याचे दिसून येते. प्रत्येक गावात वाकलेले विजेचे खांब आणि हात पूरेल एवढ्या अंतरावर आलेल्या तारा पाहावयास मिळते. या प्रकारामुळे धोका निर्माण झाला आहे. बुधवारी वर्धा ते वायगाव मार्गावर रस्त्याच्या कडेला असलेला विजेचा खांब वाकला. यामुळे ताराही लोंबकळल्या होत्या. परिणामी, काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबली होती. तारा तुटण्याची भीती असल्याने वाहन चालकांना सांभाळूनच वाहने काढावी लागत होती. या मार्गावर खांब वाकणे व तारा लोंबकळण्याचा प्रकार नेहमीच पाहावयास मिळतो. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)