शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

नाल्याला मानवी कचऱ्याचा विळखा

By admin | Updated: July 13, 2016 02:54 IST

मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे.

प्रवाह अवरुद्ध : कठडे नसल्याने नाला ठरतोय धोक्याचा वर्धा : मानवी कचऱ्यापासून कुठलाही नैसर्गिक घटक वाचू शकलेला नाही. खाली भूखंडांप्रमाणे आता मोठमोठे नालेही या कचऱ्याच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे कधीकाळी प्रवाही असलेले मोठमोठे नालेही आज आपले अस्तित्व हरवून बसले आहे. शहरानजीक नालवाडीजवळ असलेल्या एका नाल्यावर वाढत चाललेला मानवी कचरा त्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध करीत आहे. पवनार मार्गावर नालवाडी परिसरात वाहणारा नाला हा बारमाही वाहता असतो. या नाल्यावर नालवाडी भागात पूलही बांधण्यात आला आहे. या पुलाला कठडे नसल्याने हा भाग आधीच धोक्याचा ठरत आहे. पण या काही वर्षांत आसपासच्या परिसरातील मानवी कचरा या नाल्यात वरून फेकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे नाल्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. हा नाला पुढे वरूड शेतशिवारांमधून वाहतो. यामुळे वरूड भागातील विहिरींची पाणीपातळी वाढण्यास यामुळे मदतही होते. या नाल्यावर मासेमारीही केली जाते. पण शहराचा विस्तार नाल्यापर्यंत येऊन टेकल्याने कधी काळी रानवाटांमधून वाहणारा हा नाला आज शहरी वस्तीत आला आहे. परिसरातील मानवी कचरा या नाल्यात फेकला जात आहे. यात प्लास्टिकचाच भरणा जास्त असल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह अवरुद्ध होत आहे. नाल्यावर सर्वत्र प्लास्टिक कचरा पसरला आहे. यामुळे पाणी पुढे वाहून जाण्यास अवरोध होतो. सबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्याचा नैसर्गिक प्रवाह विस्तारित करण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहे.(शहर प्रतिनिधी)