शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तमच्या कामगारांना दुखापतीनुसार मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 05:00 IST

ना. बच्चू कडू यांनी शनिवारी सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उत्तमच्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, निता शेटे, डॉ. दिलीप गुप्ता, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे आदींची उपस्थिती होती. ना. कडू पुढे म्हणाले, उत्तम गलवा कंपनीत झालेल्या घटनेच्या संदर्भात काही अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

ठळक मुद्देबच्चू कडू यांनी दिले आश्वासन : कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : भूगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील कंपनीत झालेला अपघात दुर्दैवी आहे. या प्रकरणी कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. यात जो कुणी दोषी असेल त्यांच्यावर नक्कीच कठोर कारवाई हाेईल. राहिला प्रश्न जखमी कामगारांना आर्थिक मदत मिळण्याचा तर ज्यांना जशी दुखापत आहे त्यानुसारच त्यांना आर्थिक मदत कंपनीकडून दिली जाईल. त्यासाठी प्रयत्नही केले जाईल, असे आश्वासन जलसंपदा व लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालकल्याण, बहूजन कल्याण विभाग व कामगार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.ना. बच्चू कडू यांनी शनिवारी सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या उत्तमच्या जखमी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. सेवाग्राम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी कामगारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी कस्तुरबा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गगणे, प्रशासकीय अधिकारी गिरीश देव, निता शेटे, डॉ. दिलीप गुप्ता, प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे आदींची उपस्थिती होती. ना. कडू पुढे म्हणाले, उत्तम गलवा कंपनीत झालेल्या घटनेच्या संदर्भात काही अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. ते अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्राप्त होईल. या प्रकरणी सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. या प्रकरणी भादंविची कलम ३२४ तसेच ३०७ वाढविता येते काय याचीही माहिती घेतली जाईल. एकूणच हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांचा अंत केंद्र सरकारने पाहू नयेसंपूर्ण देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे असच दुर्लक्ष केले तर उद्रेक होईल. दिल्ली येथील आंदोलनाला दोन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला आहे. हे आंदोलन देशातील सर्वात मोठे आंदोलन आहे. मोदी सरकार ज्या पद्धतीन शेतकऱ्यवर वचपा काढण्याच्या पद्धतीने वागत आहे हे चुकिचे आहे. कायदा मागे घेतल्यावर नुकसान काय होईल, कोणाच्या तिजोऱ्या कमी होतील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावे. नुकसान काहीच होत नसेल तर कायदा मागे घ्यायला अडचण काय आहे हा ही प्रश्न आहे. मला अस वाटत की सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नये. असेच चालू राहील तर त्याचा उद्रेक होईल, हे मात्र निश्चित, असे मतही ना. बच्चू कडू यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू