शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

शासकीय योजनांचा लाभ कागदावरच

By admin | Updated: August 20, 2014 23:42 IST

सर्वसामान्य वंचिताचे जीवनमान उंचावून त्यांनाही इतरांसारखे जगता यावे तसेच, वृद्ध निराधार, विधवा आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचाही उदारनिर्वाह व्हावा या उदात्त हेतूने शासनाकडून अनेक

लाभार्थ्यांची फरफट : खरे लाभार्थी आर्थिक मदतीपासून वंचित विरूळ (आ.) : सर्वसामान्य वंचिताचे जीवनमान उंचावून त्यांनाही इतरांसारखे जगता यावे तसेच, वृद्ध निराधार, विधवा आणि दारिद्र्य रेषेखालील नागरिकांचाही उदारनिर्वाह व्हावा या उदात्त हेतूने शासनाकडून अनेक योजना सुरू करण्यात आल्या. परंतु शासकीय विभागातील अनेक जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या योजनांचा लाभ गरजू व खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नसल्यामुळे या योजना कागदोपत्रीच दिसून येते. गोरगरीब जनतेच जीवनमान उंचवावे यासाठी शासनाच्या विविध योजना आहे. पण बहुतांश योजनांचा फायदा ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना मिळतच नाही. हच प्रकार आर्वीच्या तहसील कार्यालयामध्ये होत असल्याची ओरड होत आहे. ग्रामीण भागातील असंख्य निराधारांसाठी राबवित असलेल्या योजनांची माहितीच मिळत नसल्याचे वास्तव आहे. माहिती घेण्यासाठी संबंधित तहसील अथवा इतर कार्यालयामध्ये गेल्यास तिथे माहिती देण्यास संबंधितांकडून टाळाटाळ केली जात आहे. योजना कोणती आहे कोणासाठी आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे हवी, ती कुणाकडे सादर करावी असे अनेक प्रश्न गरजूंसमोर उभे राहतात. परंतु याबाबत योग्य माहिती देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आर्वी तहसीलमध्ये कमी पाहायला मिळत असल्याची ओरड नागरिक करीत आहे. रेशनकार्डच्या खिडकीवर नेहमीच गर्दी असते. चहा व पानटपरीत तासनतास कार्यालयीन वेळेत गप्पा मारणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना वृद्ध निराधार लाभार्थ्यांसाठी वेळ नसतो. शासनाने म्हणायला सेतू केंद्र उघडले. परंतु या सेतू केंद्राचा कारभार वेगवेगळ्या पद्धतीने चालतो. तासनतास रांगेत उभे राहून काम होईलच याची खात्री नसते. शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या योजनेची पूर्तता योग्यरित्या होत नाही. वृद्धापकाळ निवृत्ती योजना, आम आदमी विमा योजना, शौचालयासाठी मिळणारे अनुदान, कन्यारत्न योजना, अपंगाच्या सवलती, एका मुलीवर कुटूंब नियोजन योजना, एवढेच नव्हे तर शासनाने नव्यानेच सुरू केलेली अन्नसुरक्षा योजना या व इतर अनेक योजना सर्वसामान्य गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहचल्याच नाही. शासकीय नियमानुसार या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक असते परंतु या योजनांची योग्य माहिती मिळत नसल्यामुळे अनेक गरीब गरजू लाभार्थी या चांगल्या योजनेपासून अजूनही वंचित आहे. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीची मदत शासनाने महसूल विभागाला पाठविली आहे. परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.(वार्ताहर)