शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

केळी उत्पादकांवर अस्मानी

By admin | Updated: June 5, 2015 02:12 IST

केळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत.

आर्थिक विवंचनेत भर : पारा ४७ अंशांवर गेल्याने बागा करपल्याविजय माहुरे सेलूकेळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत. यातही अस्मानी व सुलतानी संकटात त्या सापडल्या आहेत. गत १५ दिवसांतील वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील केळीच्या बागा करपल्या आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.१८ महिन्यांचे केळीचे पीक महागडे आहे. या पिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत व पावसाळा लागण्यापूर्वी येणाऱ्या वादळ, वाऱ्यापासून बचाव झाला तर केळीचे पीक पावसाळ्यात येणाऱ्या खरीप हंगामातील खर्चाला हातभार लावण्यास सार्थकी ठरते; पण यावर्षी मे महिन्यात पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या घडाला मार बसला. बहुतांश घडे गळून पडले तर पाने सुकण्याच्या मार्गावर होते. यामुळे सूर्याचे किरण बागायती शेतात जमिनीवर पडत असल्याने केलेले ओलित सुकत होते. यातच केळी उत्पादक शेतकऱ्याला वीज भारनियमनामुळे ओलितासाठी तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीचा दिवस करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशातच मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळाने या परिश्रमावर काही प्रमाणात पाणी फेरले गेले. वडगाव रेहकी व घोराड शिवारात केळीची झाडे कोलमडून पडली. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. वटपौर्णिमेपासून केळीचे घड कापून विक्रीस येत असत; पण अद्यापही कडक उन्ह तापत असल्याने कापणीला सुरूवात झालेली नाही.केळी पिकाला येणारा खर्च हा इतर पिकाच्या तुलनेत महागडा आहे. केळीचे रोपटेही नाशिक जिल्ह्यातून आणले जातात. यासाठी पैसे मोजावेच लागतात. शेणखत, रासायनिक खत, चाळण, ओढण, पाने कापणे आणि लावण तसेच केळीची झाडे खोदून बाहेर काढणे यासाठी वेळोवेळी खर्च करावा लागतो. हा खर्च पाहता केळीला परवडण्याजोगा भाव मिळेलच, याची शाश्वती राहिलेली नाही. ठिबक सिंचनासाठी केलेला खर्च व याच उत्पन्नावर असलेली आर्थिक घडी अस्मानी व सुलतानी संकटाने बिकट होत आहे. यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह केळी उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत.१८ महिन्यांचे महागडे पीक १५ दिवसांच्या उन्हाने धोक्यातपूर्वी सेलू तालुक्यात सर्वाधिक केळी पिकविली जात होती. हे पीक १८ महिन्यांचे असून यासाठी मोठा खर्च करावा लागतो. केळीची रोपेही शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातून आणावी लागतात. यासाठीही भरमसाठ खर्च लागतो. शिवाय १८ महिन्यांपर्यंत त्या पिकाची जपणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची दमछाक होते. यातही हमखास उत्पादन होईलच, याची हमी राहिलेली नाही. उन्हाळ्यात तापमान अधिक वाढल्यास केळीच्या बागा कपरतात. मे महिन्यात सतत १५ दिवस पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या बागा धोक्यात आल्या असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.