शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केळी उत्पादकांवर अस्मानी

By admin | Updated: June 5, 2015 02:12 IST

केळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत.

आर्थिक विवंचनेत भर : पारा ४७ अंशांवर गेल्याने बागा करपल्याविजय माहुरे सेलूकेळी बागायतदारांचा तालुका म्हणून सेलूची ओळख आहे; पण केळीच्या बागा नावापूरत्याच शिल्लक राहिल्या आहेत. यातही अस्मानी व सुलतानी संकटात त्या सापडल्या आहेत. गत १५ दिवसांतील वाढत्या तापमानामुळे तालुक्यातील केळीच्या बागा करपल्या आहेत. यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.१८ महिन्यांचे केळीचे पीक महागडे आहे. या पिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत व पावसाळा लागण्यापूर्वी येणाऱ्या वादळ, वाऱ्यापासून बचाव झाला तर केळीचे पीक पावसाळ्यात येणाऱ्या खरीप हंगामातील खर्चाला हातभार लावण्यास सार्थकी ठरते; पण यावर्षी मे महिन्यात पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या घडाला मार बसला. बहुतांश घडे गळून पडले तर पाने सुकण्याच्या मार्गावर होते. यामुळे सूर्याचे किरण बागायती शेतात जमिनीवर पडत असल्याने केलेले ओलित सुकत होते. यातच केळी उत्पादक शेतकऱ्याला वीज भारनियमनामुळे ओलितासाठी तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीचा दिवस करण्याची वेळ त्यांच्यावर आली. अशातच मंगळवारी सायंकाळी आलेल्या वादळाने या परिश्रमावर काही प्रमाणात पाणी फेरले गेले. वडगाव रेहकी व घोराड शिवारात केळीची झाडे कोलमडून पडली. यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. वटपौर्णिमेपासून केळीचे घड कापून विक्रीस येत असत; पण अद्यापही कडक उन्ह तापत असल्याने कापणीला सुरूवात झालेली नाही.केळी पिकाला येणारा खर्च हा इतर पिकाच्या तुलनेत महागडा आहे. केळीचे रोपटेही नाशिक जिल्ह्यातून आणले जातात. यासाठी पैसे मोजावेच लागतात. शेणखत, रासायनिक खत, चाळण, ओढण, पाने कापणे आणि लावण तसेच केळीची झाडे खोदून बाहेर काढणे यासाठी वेळोवेळी खर्च करावा लागतो. हा खर्च पाहता केळीला परवडण्याजोगा भाव मिळेलच, याची शाश्वती राहिलेली नाही. ठिबक सिंचनासाठी केलेला खर्च व याच उत्पन्नावर असलेली आर्थिक घडी अस्मानी व सुलतानी संकटाने बिकट होत आहे. यामुळे कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसह केळी उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत.१८ महिन्यांचे महागडे पीक १५ दिवसांच्या उन्हाने धोक्यातपूर्वी सेलू तालुक्यात सर्वाधिक केळी पिकविली जात होती. हे पीक १८ महिन्यांचे असून यासाठी मोठा खर्च करावा लागतो. केळीची रोपेही शेतकऱ्यांना नाशिक जिल्ह्यातून आणावी लागतात. यासाठीही भरमसाठ खर्च लागतो. शिवाय १८ महिन्यांपर्यंत त्या पिकाची जपणूक करावी लागत असल्याने शेतकऱ्यांची दमछाक होते. यातही हमखास उत्पादन होईलच, याची हमी राहिलेली नाही. उन्हाळ्यात तापमान अधिक वाढल्यास केळीच्या बागा कपरतात. मे महिन्यात सतत १५ दिवस पारा ४७ अंशांवर गेल्याने केळीच्या बागा धोक्यात आल्या असून शेतकरी त्रस्त झाले आहेत.